IND vs AUS: मेलबर्न कसोटीआधी भारतीय संघात मोठा फेरबदल, अश्विनच्या जागी या खेळाडूची एंट्री

  293

मुंबई: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघादरम्यानची ही कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. आता कसोटी मालिकेतील चौथा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळवला जात आहे.



मुंबईच्या या ऑलराऊंडरची एंट्री


मेलबर्न कसोटीआधी भारतीय संघाशी संबंधित बातमी समोर येत आहे. मुंबईच्या ऑलराऊंडर तनुष कोटियनला या मालिकेतील दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात सामील केले आहे. २६ वर्षीय तनुष ऑफ स्पिन गोलंदाजी करतात. सोबतच तो चांगला गोलंदाज आहे. तनुषने रवीचंद्रन अश्विनची जागा घेतली आहे. अश्विनने गाबा कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते.


तनुष कोटियनने २०१८-१९च्या रणजी हंगामाद्वारे फर्स्ट क्लास कसोटीत पदार्पण केले होते. कोटियनने आतापर्यंत ३३ प्रथम श्रेणी सामन्यात २५.७०च्या सरासरीने १०१ विकेट मिळवल्या आहेत. या दम्यान त्याने ३ वेळा पाच विकेट घेतल्या. बॅटिंगबाबत बोलायचे झाल्यास त्याने ४१.२१च्या सरासरीने १५२५ धावा केल्यात.


तनुष कोटियनने २० लिस्ट ए आणि ३३ टी-२० सामने खेळले आहेत. लिस्ट ए सामन्यात कोटियनच्या नावावर ४३.६० च्या सरासरीने २० विकेट मिळवल्यात.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार