Champions Trophy 2025: या ठिकाणी खेळवला जाणार भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना?

मुंबई: पाकिस्तानच्या यजमानपदाखालील पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या(Champions Trophy 2025) वेळापत्रकाचा खुलासा झाला आहे. अशातच चाहत्यांसमोर हे ही स्पष्ट झाले आहे की भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला कोणत्या मैदानावर खेळवला जाणार आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षाच्या सुरूवातीला फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळवली जाणार आहे. आयससीने आधीच स्पष्ट केले होते की ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलप्रमाणे असणार आहे. यात भारत आपला सामना दुसऱ्या देशात खेळेल. आणि घडले असेच काही.


मिडिया वृत्तानुसार भारतीय संघ सर्व सामने दुबईत खेळणार आहे. अशातच भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला याच मैदानावर होऊ शकतो. जर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सेमीफायनल आणि फायनल सामनेही यूएईमध्ये होणे निश्चित मानले जात आहे.


टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना खेळवला जाऊ शकतो. हा सामना दुबईत रंगू शकतो. दुबईचे स्टेडियम त्याच्या इतर स्टेडियमच्या तुलनेत मोठे आहे. दरम्यान या मैदानावर सामना होण्याची शक्यता अधिक आहे.



कधी जाहीर होणार चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक


आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. मात्र मिडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की भारत-पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना खेळवला जाऊ शकतो. तर स्पर्धेतील टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध असू शकतो.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना