मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भुजबळ दिल्लीला रवाना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटींनंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आज,सोमवारी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील सागर यावेळी त्यांनी सुमारे ४० मिनीटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या भेटीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा याची माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांनी दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली.



सामाजिक, राजकीय मुद्यांवर बोललो. काय काय घडले, काय चालू आहे. त्याबाबत चर्चा झाली. हे आपण मान्यच करायला हवे. की जो महाविजय मिळाला आहे. त्यामागे ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर राहिले आहे. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. ओबीसींचे नुकसान फडणवीस होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरू आहे. येत्या ८ ते १० दिवसात आपण पुन्हा भेटू आणि एक चांगलामार्ग शोधून काढू, असे फडणवीस म्हणाले. तसेच मला विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे.



हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असे फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी सांगितले. दरम्यान भाजप प्रवेशावर भुजबळांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जाऊन कुणाला भेटणार, दिल्लीवारीचे प्रयोजन काय याबाबत गोपनियता पाळण्यात आलीय.

Comments
Add Comment

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे

महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे

Mumbai Encroachment Crackdown : वांद्रे येथील 'गरीब नगर'मध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा!

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ५ दिवसीय महा-पाडकाम मोहिमेला सुरुवात मुंबई : मुंबईतील वांद्रे (Bandra) पूर्व भागात