मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भुजबळ दिल्लीला रवाना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटींनंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आज,सोमवारी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील सागर यावेळी त्यांनी सुमारे ४० मिनीटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या भेटीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा याची माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांनी दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली.



सामाजिक, राजकीय मुद्यांवर बोललो. काय काय घडले, काय चालू आहे. त्याबाबत चर्चा झाली. हे आपण मान्यच करायला हवे. की जो महाविजय मिळाला आहे. त्यामागे ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर राहिले आहे. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. ओबीसींचे नुकसान फडणवीस होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरू आहे. येत्या ८ ते १० दिवसात आपण पुन्हा भेटू आणि एक चांगलामार्ग शोधून काढू, असे फडणवीस म्हणाले. तसेच मला विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे.



हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असे फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी सांगितले. दरम्यान भाजप प्रवेशावर भुजबळांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जाऊन कुणाला भेटणार, दिल्लीवारीचे प्रयोजन काय याबाबत गोपनियता पाळण्यात आलीय.

Comments
Add Comment

Ashish Shekar : महानगरपालिका रुग्णालयातील ओपीडी आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारा

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांचे सार्वजनिक आरोग्य आढावा बैठकीत निर्देश मुंबई (विशेष

Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता

मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :