VJTI College : तंत्रज्ञानाचा अनोखा उत्सव : टेक्नोव्हान्झा २०२४

मुंबई : व्हीजेआयटी कॉलेजतर्फे (VJTI College) आयोजित तंत्रज्ञान महोत्सव "टेक्नोव्हान्झा २०२४" (Technovanza 2024) यंदा २१ डिसेंबर रोजी माजी इस्रो अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला. हा तीनदिवसीय महोत्सव २३ डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी मोफत खुला आहे. टेक्नोव्हान्झामध्ये यंदा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे जी-१ बॉट आणि चतुष्पाद रोबोट (क्वाड्रुपेड बॉट). जी-१ बॉट हा एक अत्याधुनिक बुद्धिमत्तायुक्त रोबोट असून, तो विविध कार्यक्षमता आणि संवाद साधण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय, चतुष्पाद रोबोट ही टेक्नोव्हान्झाची आणखी एक खासियत आहे. तो अवघड भूभागांवर हालचाल करू शकतो आणि भविष्यकालीन संशोधनासाठी महत्त्वाचा ठरणारा तांत्रिक शोध आहे.



तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाबाबत आवड असलेल्या प्रत्येकासाठी टेक्नोव्हान्झा हा एक सुवर्णसंधी आहे. येथे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना तंत्रज्ञानाच्या अद्ययावत गोष्टी अनुभवण्याचा विशेष अनुभव मिळेल.


टेक्नोव्हान्झामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांचे सादरीकरण, रोबोटिक्स वर्कशॉप्स, आणि अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या या महोत्सवाला भेट द्या आणि नव्या जगातील तंत्रज्ञानाचा अनुभव घ्या. आपली उपस्थिती हीच टेक्नोव्हान्झाच्या यशासाठी महत्त्वाची ठरेल.

Comments
Add Comment

Women's T20 World Cup : मुंबई महिला लीगचे पहिल्यांदाच आयोजन; इरा जाधव सर्वात महागडी क्रिकेटपटू

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामादरम्यान टी२० मुंबई लीगचा लिलाव पार पडला. पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच, फ्रँचायझींनी महिला

Casting Yard Accident : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Nails Free Tree : मुंबईतील १०७१ झाडे काँक्रीटमुक्त, झाडांवरील ५० किलो खिळ्यांच्या वेदनांचा भार केला हलका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळत असून, वृक्ष

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात