मुंबई: थंडीचे दिवस सुरू झालेत त्यासोबतच केसगळतीही मोठ्या प्रमाणात होत आहे. येथे आम्ही काही तुम्हाला उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही केस गळण्यापासून रोखू शकतो आणि चमकदार बनवू शकता. जसजशी थंडी वाढू लागते तसतशा अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे त्वचा कोरडी होणे, रॅशेस आणि सगळ्यात मोठी समस्या केस गळतीची होते.
थंड हवा आणि घराच्या आत हीटिंगमुळे केसांचे आरोग्य बिघडते. यामुळे ते निस्तेज होतात तसेच गळू लागतात. दरम्यान, थंडीच्या दिवसांत जर तुमचे केस गळत असतील तर काही जुने उपाय वापरून तुम्ही केसगळती रोखू शकता.
आवळ्याचा रस हा अनेक औषधीय गुणांसाठी ओळखला जातो. आवळ्याच्या रसामुळे तुमचे केस धुतल्यानंतर मुलायम आणि चमकदार होतात.
केसांची वाढ होण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल आणि आवळ्याचा रस वापरू शकता. एका वाटीत थोडे बदामाचे तेल गरम करा आणि त्यात आवळ्याचा रस मिसळा.
हे मिश्रण स्काल्पवर गोलाकार पद्धतीने हळूहळू मालिश करा. यामुळे केसांच्या मुळांकडे व्यवस्थित लागेल. धुण्याच्या आधी १-२ तास हे मिश्रण लावा.
जर तुमचे केस निस्तेज झाले असतील तर ते सांभाळणे कठीण होते. यासाठी कोरफडीचे जेल वापरू शकता. नारळाच्या तेलामुळेही केसांना चांगले कंडिशनिंग मिळते. तसेच केस मजबूत होण्यास मदत होते.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…