पुणे : नाश्ता आणि पोहे हे समीकरण जुळलेले आहे. दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात वाढ (Poha Price Hike) झाली असल्याने सामान्यांचा नाश्ता महाग (Inflation) झाला आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
पुणे, मुंबई ठाण्यासह राज्यातील प्रमुख शहरांत दररोज हजारो किलो पोह्यांची विक्री होते. पुणे शहरापुरता विचार केल्यास मार्केट यार्डातील भुसार बाजारात गुजरात, छत्तीसगड या दोन राज्यांतून दररोज ५० ते ६० टन पोह्यांची आवक होते. गेल्या काही दिवसांपासून बाजारात पोह्यांची आवक कमी झाल्याने क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे, असे मार्केट यार्डातील पोहे व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.
छत्तीसगडमधील भाटापारा आणि गुजरातमधील नवसारी भागातून पोह्यांची आवक होते. या दोन राज्यांतून संपूर्ण देशभरात पोहे विक्रीस पाठविले जातात. साळीवर (धान) प्रक्रिया करून पोहे तयार केले जातात. भाटापारा आणि नवसारी भागात प्रक्रिया उद्योग (मिल) आहेत. दिवाळीनंतर साळीचा तुटवडा जाणवत असल्याने तेथील प्रक्रिया उद्योग बंद ठेवण्यात आले होते. आता ते सुरू झाले आहेत. गुजरात आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांनी यंदा उत्पादन कमी घेतले. परिणामी साळींचा तुटवडा जाणवत आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…