ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

नागपूर : ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात होती. यावेळेस ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. जखमींना तातडीने माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.


लग्नासाठी ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात असताना ही दुर्देवी घटना घडली. यात ४०हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताचे वृत्त कळताच माणगाव पोलीस निरीक्षकांनी टीमसह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.


लग्नासाठी जाधव कुटुंब महाडला जात होते. यावेळेस ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडली. यात गाडी एका बाजूला पलटी झाली. त्यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात २ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Shri Mahalakshmi Temple : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; मुख्यमंत्री आणि अमित शहांच्या उपस्थितीत १,४४५ कोटींच्या विकासकामांना सुरुवात

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज

Pavanraje Nimbalkar Murder Case : आरोपींची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलांसह सर्व आरोपी निर्दोष

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या आणि तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज! पंढरपूरसाठी ५,५०० विशेष एसटी बसेस; ४० भाविकांनी मागणी केली तर गावातूनच थेट सेवा

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी तयारी

Rajmata Jijau Women's Empowerment Scheme : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना मिळणार केवळ १ रुपयात जमीन

- महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि विशेषतः

Monsoon : राज्यात २५ जूननंतर मान्सून सक्रीय होणार, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी

Crime News : प्रेमासाठी मित्रानेच मित्राची केली हत्त्या ; मुलगी एक प्रियकर दोन अन् पुढे...

नवी मुंबई : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत हे आजवर आपण ऐकत आलो आहे मात्र हे कधी सत्यात होताना पाहिलं आहे का?