ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

नागपूर : ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात होती. यावेळेस ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. जखमींना तातडीने माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.


लग्नासाठी ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात असताना ही दुर्देवी घटना घडली. यात ४०हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताचे वृत्त कळताच माणगाव पोलीस निरीक्षकांनी टीमसह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.


लग्नासाठी जाधव कुटुंब महाडला जात होते. यावेळेस ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडली. यात गाडी एका बाजूला पलटी झाली. त्यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात २ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Moshi incident : पुणे जिल्ह्यातील मोशी दुर्घटनेच्या ठिकाणी ७२ तासांनंतरही बचावकार्य सुरू

पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग आला असून दुर्घटनाग्रस्त

Solapur News : सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सोलापुरात आलेली २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Chandrashekhar Bawankule : परप्रांतीयांच्या कोकणातील जमीन खरेदीची चौकशी

- विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती; बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झालेल्या जमिनी सरकारजमा होणार मुंबई :

kharif pik vima : खरीप २०२६ पीक विम्यासाठी नवे नियम लागू; अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी या 5 गोष्टी जाणून घ्या

मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा योजनेत (Crop Insurance) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदा पीक विमा (Pik Vima)

Jalgaon : जळगाव-इंदूर विमानसेवेच्या हालचालींना पुन्हा वेग; डीजीसीएकडे तिसऱ्यांदा प्रस्ताव, लवकरच उड्डाणाची शक्यता

Jalgaon : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जळगाव-इंदूर थेट विमानसेवेच्या

Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन