Stray Dog : मीरारोडमध्ये ८ वर्षीय मुलाचे कुत्र्याने तोडले लचके; डॉक्टरांनी दिला प्लॅस्टिक सर्जरीचा सल्ला

मीरारोड : भटक्या कुत्र्याने (Stray Dog) एका आठ वर्षीय चिमुरड्यावर हल्ला करून त्याच्या शरीराची अक्षरश: चिरफाड केल्याचा भीषण प्रकार मीरारोड (Mira Road) मध्ये घडला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर या चिमुकल्याच्या चेहर्‍याला, तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत.


ही घटना सोमवार १६ डिसेंबरच्या सकाळची आहे. हा मुलगा फूटबॉल खेळत असताना घराबाहेर त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला.


या मुलाचं नाव दक्ष रावत आहे. मीरा रोड मध्ये पूनम सागर भागामध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. लहान मुलगा फूटबॉल खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने त्याचा चेहर्‍यावर आणि तोंडावर हल्ला केला. तातडीने त्याच्या मित्रांनी दक्षच्या कुटुंबियांना कळवले. त्यांनी दक्षला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मुलाची स्थिती पाहून आता प्लॅस्टिक सर्जरीचा (Plastic surgery) सल्ला दिला आहे.




Plastic surgery

दक्षच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाने कुत्र्याची कळ काढली नव्हती. तसेच काही दिवसांपूर्वीच त्या कुत्र्याचे व्हॅक्सिनेशन झाले होते. याच कुत्र्याने काही दिवसांपूर्वी सोसायटी मध्ये काही डिलिव्हरी बॉय आणि मुलांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर दक्षच्या वडिलांनी जेव्हा प्रशासनाला हा प्रकार कळवला तेव्हा त्यांनी या कुत्र्याचे काही दिवसापूर्वीच लसीकरण झाल्याचे म्हटले आहे.


दरम्यान, मिरा-भाईंदर भागात दररोज सरासरी ३२ जणांना कुत्रे चावल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मीरा-भाईंदर भागात सुमारे ३० हजार भटकी कुत्री (Stray Dog) असून त्यापैकी काहींनी नागरिकांवर हल्ला केल्याचेही वृत्त आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा