Water Transport : समुद्रातील गाळाचा जलवाहतुकीला फटका!

नवी मुंबई : मुंबई येथे जलद प्रवास होण्यासाठी उरण येथील मोरा या ठिकाणाहून जलवाहतूक (Water Transport) मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र सध्या या जलवाहतूकीचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


मोरा येथील समुद्र किनारी धक्क्यालगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे प्रवासी बोटी दुसऱ्या ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब होत आहे. प्रवासी बोटीमध्ये चाकरमान्यांसह अनेक कर्मचारीही प्रवास करतात. मात्र कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात पोहोचणे शक्य होत नसल्याने पगार कपातीला सामोरे जावे लागत आहे.



दरम्यान, यामुळे प्रवासी त्रस्त असून प्रवाशांकडून जलवाहतुक व औद्योगिक सहकारी संस्था, भाऊचा धक्का, मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार करत गाळ काढण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गाळ अत्याधुनिक पद्धतीने काढल्यास जास्त काळ राहील अन्यथा बंदराची लांबी वाढवावी, जेणे करून प्रवाशांचा थोडा मानसिक त्रास कमी होण्यास मदत होईल, असेही प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.



जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या



  • मोरा बंदरात चिखल जास्त असल्याने जलवाहतुक व औद्दोगिक सहकारी संस्थेच्या बोटी ४ ते ५ तास बंद असतात आणि ते ही ५ ते ६ दिवस.

  • खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर कामावर पोहचता येत नाही. महिन्यातून ३ ते ४ लेट मार्क लागतात.

  • महिन्यातुन दोनदा म्हणजेच आमावस्या व पोर्णिमेला बोटिंचे वेळापत्रक बदलते.

  • भाऊच्या धक्यावरून सुटलेल्या बोटी काहीवेळा मोरा बंदरात चिखलात अडकतात, त्यामुळे वेळेवर पोहचणाऱ्या प्रवाशांमध्ये व बोट चालकांमध्ये कधीतरी शाब्दीक वाद विवाद होतात.

  • वेळपत्रक चुकल्याने बस, ट्रेन मिळत नाही, जास्त खर्च करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार

मुंबई: महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र

Chief Minister Devendra Fadnavis : मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार

मुंबई : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

Amravati : १७ पैकी ४ मतदारसंघात 'मविआ' निवडणुकीआधीच स्पर्धेबाहेर

अमरावतीत शिवसेनेच्या बंडखोराचा अर्ज बाद; नाशिकमध्ये 'उबाठा'कडून शरणागती मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य

Labor Minister Adv. Akash Fundkar : राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी न होण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार

मुंबई : आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून

Tourism Policy of Maharashtra : हॉटेल्सना 'स्टार श्रेणी प्रमाणपत्रा'ची सक्ती हटवली

पर्यटन विभागाचा निर्णय; 'हॉटेल' आणि 'होमस्टे'च्या व्याख्यांमध्ये सुधारणा मुंबई : राज्यात पर्यटन क्षेत्राला चालना

Nitesh Rane : चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू होणार

मंत्री नितेश राणे यांच्याकडे प्रस्ताव सादर; प्रमुख पर्यटनस्थळांमधील संपर्क वेगवान होणार मुंबई : सिंधुदुर्ग