Mumbai Boat Accident : गेटवेच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांचे मदतीचे आश्वासन

  122

मुंबई : मुंबईत आज गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली. या घटनेत बोटीतील सर्व प्रवासी बुडाले. माहिती मिळताच मदत पथक दुसऱ्या बोटीतून घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. बोटीत ८० प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत ७७ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर ३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


मी नुकताच मुंबईतील घटनेचा व्हिडिओ पाहिला. कोस्ट गार्ड किंवा भारतीय नौदलाची ती बोट आहे. त्या बोटीचे नियंत्रण सुटल्याने तिथे प्रवासी बोट होती ही एलीफंटाकडे जात होती. त्या बोटीला धडक दिली आहे. त्या ठिकाणी मदत वेगाने पोहोचल्याने अनेक जणांना वाचवण्यात यश आले आहे. जे कोणी जखमी झाले असतील किंवा काही लोकांचा मृत्यू झाला असेल तर सरकार म्हणून आवश्यक मदत आम्ही करू.





हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक लोक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. सुमारे ५० मीटर त्यांची बोट किनारा सोडून आत गेल्यावर अचानक काहीतरी झाले आणि ती बुडू लागली. या अपघताची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदतीचे आश्वासन केलं आहे.

Comments
Add Comment

आता वेळेत पूर्ण होणार मुंबई मेट्रोची कामे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. एमएमआरडीए हणजेच मुंबई महानगर

गोठवलेल्या बँक खात्यांतील पैसे खातेदारांना लवकर मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात

आरोग्य सांभाळा, डेंग्यूचा धोका वाढला!

मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली असून राज्यात अनेक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरण्याचे नियोजन

मुंबई  : मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक

Power Cut: कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्ये अनिच्छित काळासाठी वीजपुरवठा खंडित! महावितरणकडून महत्त्वाची अपडेट

भिवंडी-पडघा येथील 220 केवी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड कल्याण: कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या उपनगरांमधील

Jansurksha Bill : महाराष्ट्राला 'जनसुरक्षा कवच'

'शहरी नक्षलवादा'ला लगाम बसणार, १३ हजार सूचनांनी विधेयक तयार! जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर, तेरा हजार सूचनांनी