Cold Wave: थंडीची लाट : काय करावे, काय करू नये

सांगली : थंडीच्या लाटेसंदर्भात(cold wave) करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून, संभाव्य आपत्तीमध्ये मृत्यू दर शून्य राहण्यासाठी सर्वांनी आपल्या स्तरावर खबरदारी घ्यावी. तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे - थंडीची लाट येण्यापूर्वी – हिवाळ्यामध्ये वापरण्यासाठी लोकरीचे कपडे खरेदी करावेत. रात्री पांघरण्यासाठी चादर, घोंगडी, रग असे सर्वांना पुरतील याची काळजी घ्यावी. नसल्यास त्याची खरेदी करून ठेवावी. आपत्कालीन उपाय योजना तयार ठेवावी. थंडीची लाट आल्यानंतर (दरम्यान) - शक्य तितके घरी रहावे.


थंड हवेमध्ये प्रवास टाळणे किंवा कमी करणे आवश्यक, शरीरातील उष्णता कमी होऊ नये यासाठी गरम कपडे वापरावे, ओले कपडे तात्काळ काढून टाकावे, अंग कोरडे ठेवावे, गरम पेय घ्यावे, थंड किंवा फ्रीज मधील पेय टाळावे, वृध्द व्यक्ती व लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी, लक्ष द्यावे, वर्तमान पत्र, रेडिओ यावरील बातम्या वाचणे / पहाणे, थंडीमुळे कानाच्या पाळ्या, नाकाचे टोक, किंवा हाताची बोटे पांढरी फिकट दिसू लागल्यास किंवा शरीरातील तापमान कमी झाल्यास भरपूर उबदार कपड्यांनी पांघरून घ्यावे, गरम पेय घ्यावे, मद्य देऊ नये त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते,,थंडीमुळे हुडहुडी किंवा अंग थरथरत असेल तर वैद्यकीय मदत घ्यावी.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी