ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत भारताची स्थिती खराब झाली आहे. भारताने केवळ २२ धावांमध्ये ३ विकेट गमावलेत. विराट कोहली ३, यशस्वी जायसवाल ४ आणि शुभमन गिल केवळ एक धावा करू शकला. केएल राहुल क्रीझवर आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे भारत अद्याप ४२३ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे केवळ ७ फलंदाज शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी जबरदस्त शतकी खेळी केली. स्मिथने १९० बॉलमध्ये १०१ धावा केल्या तर ट्रेविस हेडने १६० बॉलमध्ये १५२ धावा तडकावल्या.
तर अॅलेक्स कॅरेने ७० धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला चारशेपार धावसंख्या नेण्यात मदत केली. कर्णधार पॅट कमिन्सला या डावात केवळ २० धावाच करता आल्या. याआधी झालेल्या दोन कसोटी सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया १-१ अशा बरोबरीत आहेत. भारताने पहिला कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने कमबॅक करताना दुसऱ्या कसोटीत भारतावर मात केली. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात सध्या तरी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…