IND vs AUS: तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी भारत खराब स्थितीत

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत भारताची स्थिती खराब झाली आहे. भारताने केवळ २२ धावांमध्ये ३ विकेट गमावलेत. विराट कोहली ३, यशस्वी जायसवाल ४ आणि शुभमन गिल केवळ एक धावा करू शकला. केएल राहुल क्रीझवर आहे.


दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे भारत अद्याप ४२३ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे केवळ ७ फलंदाज शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी जबरदस्त शतकी खेळी केली. स्मिथने १९० बॉलमध्ये १०१ धावा केल्या तर ट्रेविस हेडने १६० बॉलमध्ये १५२ धावा तडकावल्या.


तर अॅलेक्स कॅरेने ७० धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला चारशेपार धावसंख्या नेण्यात मदत केली. कर्णधार पॅट कमिन्सला या डावात केवळ २० धावाच करता आल्या. याआधी झालेल्या दोन कसोटी सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया १-१ अशा बरोबरीत आहेत. भारताने पहिला कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने कमबॅक करताना दुसऱ्या कसोटीत भारतावर मात केली. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात सध्या तरी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक