बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून तीन खेळाडूंना भारतात परत पाठवले 

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघ(indian cricket team) ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळत आहे. या कसोटी सामन्यादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये तीन मोठ्या खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावस्कर करंडक संघातून तीन प्रवासी राखीव-मुकेश कुमार, यश दयाल आणि नवदीप सैनी यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयने मोठा निर्णय घेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेदरम्यान वेगवान गोलंदाज यश दयाल, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना भारतात परत पाठवले आहे.हे तीन वेगवान गोलंदाज बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघासोबत होते. पण संघ व्यवस्थापनाला असे वाटले की, ब्रिस्बेन सामन्यानंतर आता फक्त दोन कसोटी सामने बाकी आहेत, त्यामुळे आता त्याचे थांबणे काही योग्य नाही. या ३ खेळाडूंना भारतात परत पाठवण्यात आले आहे. कारण विजय हजारे ट्रॉफी २१ डिसेंबरपासून सुरू होत असून हे सर्व खेळाडू आपापल्या संघाकडून खेळताना दिसणार आहेत.

भारत आपले पुढील सामने मेलबर्न आणि सिडनी येथे खेळेल आणि त्यानंतर मायदेशी परतेल. ऑस्ट्रेलियन दौरा मुकेशसाठी थकवणारा दौरा ठरला आहे, कारण तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेपूर्वी दोन सामन्यांसाठी भारत अ संघासोबत येथे पोहोचला होता.यश दयालचा सुरुवातीला राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला नव्हता, मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.


माहितीनुसार, यशने आधीच ऑस्ट्रेलिया सोडले असून आगामी स्पर्धेसाठी तो उत्तर प्रदेशला जाण्याची तयारी करत आहे. जोपर्यंत सैनीचा संबंध आहे, तो ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर भारत अ संघाचा एकच सामना खेळला आहे आणि तेव्हापासून तो नेट ड्युटीवर आहे.त्यामुळे विजय हजारे ट्रॉफी सामना खेळण्यासाठी या ३ खेळाडूंना भारतात परत पाठवण्यात आले आहे.विजय हजारे ट्रॉफीची २०२५ आवृत्ती २१ डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि हे सामने आठ यजमान शहरांमध्ये १८ ठिकाणी खेळवले जातील.

Comments
Add Comment

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

फुटबॉलपटू मोहम्मद सलाह नऊ वर्षांनंतर लिव्हरपूलची साथ सोडणार

नवी दिल्ली : इजिप्शियन फुटबॉलचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने लिव्हरपूल फुटबॉल क्लब सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती

कोलकाता : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी