Crime News : लग्नांचा खेळ! दोघींशी लग्न, तिसरीसोबत फोडली लग्नाची सुपारी आणि चौथीसोबत सुरु लग्नाची बोलणी

नेरळ : प्रख्यात लेखक आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या 'तो मी नव्हेच' या अजरामर नाटकातील मुख्य पात्र असलेल्या 'लखोबा लोखंडे'च्या भूमिका सत्यात उतरली असल्याचे समोर आली आहे. रत्नागिरीमधील एका माणसाने दोघींशी लग्न, तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडून चौथीसमवेत लग्नाची बोलणी करणाऱ्या आरोपीला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. विशेषत: यामध्ये एक महिला पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे लग्न जुळत नाही किंवा ज्यांचे वय आधिक झाले आहे अशा महिलांसोबत ओळख निर्माण करून आरोपी योगेश यशवंत हुमने (३३) हा महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम करत होता. आरोपी योगेशने आतापर्यंत अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी कडक तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.



प्रकरण कसे आले समोर?


कोल्ह्यारे जवळील राहणारी ३४ वर्षीय पीडित विवाहित महिलेने आपल्याच पती विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महिलेने पतिविरोधत मानसिक छळवणूक आणि आर्थिक फसवणूक तसेच पतीचे या आधी लग्र झाले असताना, माझी फसवणूक करून माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे तक्रारीत म्हटले होते. यामधे १५ ते २० लाखाची आर्थिक फसवणूक केल्याचे पीडित महिलने सांगितले होते. याबाबत तक्रारदार महिलेच्या सांगण्यावरून पती योगेश यशवंत हुमने या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी