Maharashtra Cabinet Expansion: आमदार नितेश राणे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

मुंबई: राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार(Maharashtra Cabinet Expansion) नागपुर येथे पार पडला. या हिवाळी अधिवेशनात भाजपकडून एकूण १९ मंत्र्‍यांनी शपथ घेतली. यामध्ये कणकणवली मतदार संघाचे आमदार नितेश नारायण राणे यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.


आज नागपूर विधानभवन येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या हस्ते नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदुत्वाचे विचार आणखी भक्कम करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील व माझ्या विधानसभेतील जनतेची सेवा करण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार असल्याचे नितेशजी राणे म्हणाले. नितेश राणे यांच्या रूपाने राज्यातील मंत्रिमंडळामध्ये तरूण चेहरा मिळाला आहे.


 


निवडणुकीत सलग तिसरा विजय


नितेश राणे सलग तिसऱ्यांदा कणकवली मतदार संघातून निवडून आले आहेत. नितेश राणे २०१४मध्ये पहिल्यांदा कणकवली मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंत २०१९मध्येही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यातही त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून विजय मिळवत हॅटट्रिक साधली.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा