Maharashtra Cabinet Expansion: राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार, नागपुरात होणार शपथविधी

Share

मुंबई: महायुतीच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. यात नवे मंत्री नागपुरातील शपथविधी सोगळ्यात शपथ घेतील. यातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शपथविधी सोहळ्यादरम्यान ३० ते ३२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

राज्यात होत असलेला मंत्रिमंडळ विस्तार अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हा विस्तार अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीपरिषदेत मुख्यमंत्र्‍यांसह अधिकाधिक ४३ सदस्य असू शकतात. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नुकतेच राज्य भाजपा प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची वेगवेगळी भेट घेतली होती.

सूत्रांच्या म्हणण्यांनुसार भाजपला या मंत्रिमंडळात २०-२१ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यानंतर शिवसेनेला ११-१२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९-१० मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.

निवडणुकीत महायुतीला २३० जागा

२० नोव्हेंबरला राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ जागांपैकी २३० जागांवर विजय मिळवण्यात यश मिळाले होते. भाजपाने या निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने ५७ तर पवारांच्या एनसीपी गटाने ४१ जागांवर विजय मिळवला होता.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

2 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

3 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

3 hours ago