Maharashtra Cabinet Expansion: राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार, नागपुरात होणार शपथविधी

मुंबई: महायुतीच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. यात नवे मंत्री नागपुरातील शपथविधी सोगळ्यात शपथ घेतील. यातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शपथविधी सोहळ्यादरम्यान ३० ते ३२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.


राज्यात होत असलेला मंत्रिमंडळ विस्तार अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हा विस्तार अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीपरिषदेत मुख्यमंत्र्‍यांसह अधिकाधिक ४३ सदस्य असू शकतात. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नुकतेच राज्य भाजपा प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची वेगवेगळी भेट घेतली होती.


सूत्रांच्या म्हणण्यांनुसार भाजपला या मंत्रिमंडळात २०-२१ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यानंतर शिवसेनेला ११-१२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९-१० मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.



निवडणुकीत महायुतीला २३० जागा


२० नोव्हेंबरला राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ जागांपैकी २३० जागांवर विजय मिळवण्यात यश मिळाले होते. भाजपाने या निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने ५७ तर पवारांच्या एनसीपी गटाने ४१ जागांवर विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या