सेंट्रल रेल्वेच्या प्रवाशांचा आज लेट मार्क लागणार!

टिटवाळा ते csmt दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरा


मुंबई : आज सकाळपासूनच मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. टिटवाळा येथे वायरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत.लोकलला विद्युत पुरवठा नसल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही साईड बंद आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली असून कामावर निघालेल्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून सेवा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक सप्लायर ( O.H.E) मध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळी ठप्प झाली. यामुळे कल्याण ते इगतपुरी तसेच बदलापूर ते लोणावळा या मार्गावर सर्व लोकल एकाच जागेवर उभ्या होत्या. शनिवारी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी ओ.एच.ई. सप्लायर बंद झाला होता. रेल्वे प्रशासनाच्या कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत इलेक्ट्रिक सप्लायर मधील बिघाड दूर केला. त्यानंतर ६ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास रेल्वे वाहतूक सेवा सुरू झाली.



मात्र इलेक्ट्रिक सप्लायर मधील हा बिघाड दूर झाला असला तरी रेल्वे वाहतूक अद्यापही अर्धा तास उशिराने सुरू आहे. सकाळी घाईच्या वेळेस रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे कामावर निघालेले कर्मचारी, तसेच कॉलेज, क्लासला निघालेले विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागला. लोकल उशीरा धावत असल्यामुळे स्टेशनवरील आणि पर्यायाने गाडीतील गर्दीही वाढली. त्यामुळे तर प्रवाशांच्या मनस्तापात आणखीनच वाढ झाली. अनेकांना लेटमार्कचा सामना करावा लागण्याची भीती सतावत आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन