सेंट्रल रेल्वेच्या प्रवाशांचा आज लेट मार्क लागणार!

टिटवाळा ते csmt दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरा


मुंबई : आज सकाळपासूनच मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. टिटवाळा येथे वायरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत.लोकलला विद्युत पुरवठा नसल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही साईड बंद आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली असून कामावर निघालेल्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून सेवा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक सप्लायर ( O.H.E) मध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळी ठप्प झाली. यामुळे कल्याण ते इगतपुरी तसेच बदलापूर ते लोणावळा या मार्गावर सर्व लोकल एकाच जागेवर उभ्या होत्या. शनिवारी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी ओ.एच.ई. सप्लायर बंद झाला होता. रेल्वे प्रशासनाच्या कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत इलेक्ट्रिक सप्लायर मधील बिघाड दूर केला. त्यानंतर ६ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास रेल्वे वाहतूक सेवा सुरू झाली.



मात्र इलेक्ट्रिक सप्लायर मधील हा बिघाड दूर झाला असला तरी रेल्वे वाहतूक अद्यापही अर्धा तास उशिराने सुरू आहे. सकाळी घाईच्या वेळेस रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे कामावर निघालेले कर्मचारी, तसेच कॉलेज, क्लासला निघालेले विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागला. लोकल उशीरा धावत असल्यामुळे स्टेशनवरील आणि पर्यायाने गाडीतील गर्दीही वाढली. त्यामुळे तर प्रवाशांच्या मनस्तापात आणखीनच वाढ झाली. अनेकांना लेटमार्कचा सामना करावा लागण्याची भीती सतावत आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी