Tamilnadu: खाजगी रुग्णालयात मोठी दुर्घटना, आग लागल्याने ७ जणांचा मृत्यू

मुंबई: तामिळनाडूच्या डिंडीगुलमध्ये गुरूवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका खाजगी रुग्णालयात आग लागल्याने ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक मुलगा आणि ३ महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये तिघांची स्थिती गंभीर आहे. या सर्वांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मिडिया रिपोर्टनुसार रुग्णालयाच्या आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यानंतर लोकांना बाहेर काढून १० सरकारी अॅम्ब्युलन्स आणि ३० खाजगी अॅम्ब्युलन्सच्या मदतीने दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले.



दुर्घटनेप्रकरणी कलेक्टर यांचे विधान


या दुर्घटनेप्रकरणी जिल्हा कलेक्टर यांचे विधान आले आहे. त्यांनी एजन्सीला सांगितले की १० वाजण्याच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात आग लागली होती. रुग्णांना वाचवून जवळच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांबाबतची माहिती डॉक्टरांनी पुष्टी दिल्यानंतरच दिली जाईल.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही