Syed Mushtaq Ali Trophy : अजिंक्य रहाणेची स्फोटक खेळी, मुंबई फायनलमध्ये

  102

बंगळुरू : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चा पहिला उपांत्य सामना १३ डिसेंबर रोजी खेळला गेला. हा उपांत्य सामना बडोदा आणि मुंबई यांच्यात पार पडला, जो बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत मुंबईने दमदार कामगिरी करत बडोद्याला ६ विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. जिथे अजिंक्य रहाणेच्या ९८ धावांच्या खेळीने मुंबईच्या विजयाची कहाणी लिहिली. रहाणेच्या या खेळीने मुंबईला अंतिम फेरीत नेले.


या सामन्यात कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाने केवळ ४ गडी गमावून १६ चेंडू बाकी (17.2 षटक) असताना १६४ धावा करत सामना जिंकला.मुंबईच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, ज्यात सूर्यांश शेडगेने 2 षटकात केवळ ११ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. त्याचवेळी तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.विशेष म्हणजे मुंबईच्या या विजयाचा हिरो 36 वर्षीय अजिंक्य रहाणे ठरला.उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही या भारतीय फलंदाजाने शानदार फलंदाजी करत ८४ धावांची शानदार खेळी केली होती. मुंबईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू हंगामात 8 सामन्यांमध्ये 432 हून अधिक धावा केल्या आहेत.


१५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात संथ झाली होती, मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या जोडीने शानदार भागीदारी करत सामना बडोद्याच्या पकडीपासून दूर नेला. अजिंक्य रहाणेला रोखण्यात बडोदा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेने १७५ च्या स्ट्राईक रेटने ५६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ९८ धावांची नाबाद खेळी खेळली. रहाणेसह श्रेयस अय्यरने ३० चेंडूत ४६ धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले. बडोद्याच्या गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या, अभिमन्यू सिंग राजपूत आणि शाश्वत रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, पण ते मुंबईच्या फलंदाजीला रोखण्यात अपयशी ठरले आहे. मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली असून आता त्यांच्या नजरा विजेतेपदावर असणार आहेत.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र