Syed Mushtaq Ali Trophy : अजिंक्य रहाणेची स्फोटक खेळी, मुंबई फायनलमध्ये

  88

बंगळुरू : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चा पहिला उपांत्य सामना १३ डिसेंबर रोजी खेळला गेला. हा उपांत्य सामना बडोदा आणि मुंबई यांच्यात पार पडला, जो बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत मुंबईने दमदार कामगिरी करत बडोद्याला ६ विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. जिथे अजिंक्य रहाणेच्या ९८ धावांच्या खेळीने मुंबईच्या विजयाची कहाणी लिहिली. रहाणेच्या या खेळीने मुंबईला अंतिम फेरीत नेले.


या सामन्यात कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाने केवळ ४ गडी गमावून १६ चेंडू बाकी (17.2 षटक) असताना १६४ धावा करत सामना जिंकला.मुंबईच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, ज्यात सूर्यांश शेडगेने 2 षटकात केवळ ११ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. त्याचवेळी तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.विशेष म्हणजे मुंबईच्या या विजयाचा हिरो 36 वर्षीय अजिंक्य रहाणे ठरला.उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही या भारतीय फलंदाजाने शानदार फलंदाजी करत ८४ धावांची शानदार खेळी केली होती. मुंबईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू हंगामात 8 सामन्यांमध्ये 432 हून अधिक धावा केल्या आहेत.


१५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात संथ झाली होती, मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या जोडीने शानदार भागीदारी करत सामना बडोद्याच्या पकडीपासून दूर नेला. अजिंक्य रहाणेला रोखण्यात बडोदा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेने १७५ च्या स्ट्राईक रेटने ५६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ९८ धावांची नाबाद खेळी खेळली. रहाणेसह श्रेयस अय्यरने ३० चेंडूत ४६ धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले. बडोद्याच्या गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या, अभिमन्यू सिंग राजपूत आणि शाश्वत रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, पण ते मुंबईच्या फलंदाजीला रोखण्यात अपयशी ठरले आहे. मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली असून आता त्यांच्या नजरा विजेतेपदावर असणार आहेत.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला