Syed Mushtaq Ali Trophy : अजिंक्य रहाणेची स्फोटक खेळी, मुंबई फायनलमध्ये

बंगळुरू : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चा पहिला उपांत्य सामना १३ डिसेंबर रोजी खेळला गेला. हा उपांत्य सामना बडोदा आणि मुंबई यांच्यात पार पडला, जो बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत मुंबईने दमदार कामगिरी करत बडोद्याला ६ विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. जिथे अजिंक्य रहाणेच्या ९८ धावांच्या खेळीने मुंबईच्या विजयाची कहाणी लिहिली. रहाणेच्या या खेळीने मुंबईला अंतिम फेरीत नेले.


या सामन्यात कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाने केवळ ४ गडी गमावून १६ चेंडू बाकी (17.2 षटक) असताना १६४ धावा करत सामना जिंकला.मुंबईच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, ज्यात सूर्यांश शेडगेने 2 षटकात केवळ ११ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. त्याचवेळी तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.विशेष म्हणजे मुंबईच्या या विजयाचा हिरो 36 वर्षीय अजिंक्य रहाणे ठरला.उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही या भारतीय फलंदाजाने शानदार फलंदाजी करत ८४ धावांची शानदार खेळी केली होती. मुंबईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू हंगामात 8 सामन्यांमध्ये 432 हून अधिक धावा केल्या आहेत.


१५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात संथ झाली होती, मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या जोडीने शानदार भागीदारी करत सामना बडोद्याच्या पकडीपासून दूर नेला. अजिंक्य रहाणेला रोखण्यात बडोदा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेने १७५ च्या स्ट्राईक रेटने ५६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ९८ धावांची नाबाद खेळी खेळली. रहाणेसह श्रेयस अय्यरने ३० चेंडूत ४६ धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले. बडोद्याच्या गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या, अभिमन्यू सिंग राजपूत आणि शाश्वत रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, पण ते मुंबईच्या फलंदाजीला रोखण्यात अपयशी ठरले आहे. मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली असून आता त्यांच्या नजरा विजेतेपदावर असणार आहेत.

Comments
Add Comment

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना