२५ वर्षे वय असेल तरच मिळणार दारू, दिल्ली सरकारचे आदेश

नवी दिल्ली : तरुणांमध्ये वाढत चाललेले मद्यपानाचे प्रमाण पाहता दिल्ली सरकारने मद्यपानाचे वय निश्चित केले आहे. यापुढे २५ वर्ष आणि त्यावरील लोकांनाच मद्यपान करता येणार आहे. तसेच मद्यपानासाठी मद्यपींना वय नमूद असलेले ओळखपत्र किंवा पुरावा द्यावा लागणार आहे. दिल्ली सरकारने हॉटेल, क्लब, रेस्टॉरंट, परमिट रूमधारकांसाठी निर्देश जारी केले आहेत.


दिल्लीतील उत्पादन शुल्क खात्याला नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते. अल्पवयीन मुलेही मद्यपान करीत असल्यामुळे वयाची अट निश्चित करण्यात आली आहे. मद्यपींना ओळखपत्र दाखविल्याशिवाय दिल्लीमध्ये मद्यपान करण्यास परवानगी मिळणार नाही. अल्पवयीन अथवा २५ वर्षांच्या आतील मुलांना मद्यविक्री केल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. परवानाधारक अथवा त्यांच्या कर्मचार्‍यांना नव्या अटींचे पालन करावे लागणार आहे. दिल्लीतील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्ली सरकारने परिपत्रक धाडले आहे.


उत्पादन शुल्क खात्याने वयाची खातरजमा करण्यासाठी मद्यविक्री परवानधारकांसाठी नवीन अ‍ॅप सुरू केले आहे. डीजीलॉकर अ‍ॅपद्वारे परवानाधारकांना मद्यपींच्या वयाची खातरजमा करता येणार आहे. भौतिक आयडीचा वापर केल्यानंतर मद्यपीचे वय २५ वर्षांपेक्षा जादा आहे की लहान हे समजण्यास मदत होणार आहे.


मद्यसेवनासाठी २१ व २५ वयाची अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार सौम्य क्षमतेचे मद्यसेवन करण्यासाठी २१ वय पूर्ण असणे आवश्यक आहे. तर 'हार्ड ड्रिंक' करण्यासाठी २५ वय पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मद्य वाहतुकीसाठीही हाच नियम लागू आहे. कायद्यानुसार, महाराष्ट्रात दारू खरेदी करण्यासाठी, बाळगण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी किंवा सेवन करण्यासाठी मद्य परमिट आवश्यक आहे. तसेच २५ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती त्याच्या आरोग्याची जपणूक आणि देखभाल करण्यासाठी मद्य परमिट मिळविण्यास पात्र आहे. परवानाशिवाय मद्य खरेदी करणे, सेवन करणे हा 'बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट, १९४९ अंतर्गत गुन्हा आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात