Rajya Sabha : काँग्रेसच्या अविश्वास ठरावाने सभागृहात पुन्हा गदारोळ; राज्यसभेचे कामकाज १६ डिसेंबरपर्यत तहकूब

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १६ व १७ डिसेंबरला राज्यसभेत भारतीय संविधानावर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी काँग्रेसने राज्यसभा (Rajya Sabha) सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडला. यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानच शुक्रवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर १६ डिसेंबरपर्यंत राज्यसभा सभागृह तहकूब करण्यात आले आहे.


राज्यसभा सभापती सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवत नाहीत. विरोधी पक्षांना पुरेसा वेळ दिला जात नाही, असा आरोप विरोधी पक्षाने अविश्वास ठराव मांडताना केला आहे. यावर सभापतींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विरोधकांच्या अविश्वास ठरावावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मरेन पण झुकणार नाही. तुम्ही लोकांनी संविधानाचे तुकडे केलेत. मी खूप सहन केले. तुम्हाला प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे; पण तुम्ही संविधानाचा अपमान करत आहात, अशा शब्दांमध्ये सभापतींनी त्यांचे मत व्यक्त केले.



काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा राज्यसभा सभापतींवर पक्षपाताचा आरोप केला.ते म्हणाले, तुम्ही भाजप खासदारांना बोलण्याची संधी देत आहात, तर काँग्रेसला नाही. आम्ही तुमची स्तुती ऐकायला इथे आलो नाही तर जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आलो आहोत.


संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज २५ नोव्हेंबरपासून सुरू आहे. दरम्यान अदानी भष्टाचार प्रकरण, संभल, मणिपूर हिंसाचार यांसारखे मुद्दे अधिवेशनादरम्यान गाजले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी सभापतींविरोधातील आरोप खोडत काँग्रेसचे हे सभागृहातील वर्तन नियमांविरोधात आहे, असे प्रत्त्युत्तर दिले. दरम्यान सभागृहात प्रचंड गदारोळ झाला, यानंतर सभागृहाचे कामकाज सोमवार १६ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या