तीन दिवसांनी कुर्ला स्थानकातून बेस्टची सेवा सुरू

मुंबई : कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर खबरदारी म्हणून बेस्ट प्रशासनाने सोमवारी रात्रीपासूनच येथील बेस्ट सेवा पूर्णपणे बंद केली होती. या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी रात्रीच कुर्ला पश्चिम स्थानकात उभ्या असलेल्या सर्व बसगाड्या कुर्ला आगारात नेण्यात आल्या. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून कुर्ला पश्चिम स्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही. या परिसरातील तणावाचे वातवरण लक्षात घेऊन मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील बस स्थानकावरील बेस्ट सेवा बंद होती. परिणामी प्रवाशांना दीड किलोमीटर पायपीट करून कुर्ला रेल्वे स्थानकातून कुर्ला आगार गाठावे लागत होते.



शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांना करावी लागणारी पायपीट लक्षात घेऊन बेस्टने शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून पुन्हा एकदा कुर्ला पश्चिम स्थानक परिसरातील बस सेवा सुरू केली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य