Shirdi Sai Temple : थ्रीडी स्कॅनिंग डाटा संरक्षण; २० डिसेंबर रोजी साई मंदिर राहणार पावणेतीन तास बंद

  95

शिर्डी : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील साईबाबांची संगमरवरी (इटालियन मार्बल) मूर्तीचा पुरातत्व विभागाकडून थ्रीडी स्कॅनिंग डाटा संरक्षित करण्यासाठी दर्शनात तात्पुरता बदल करण्यात आला असून शुक्रवार दि २० डिसेंबर रोजी पावणेतीन तास साई मंदिर बंद असणार असल्याची माहिती संस्थान प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरातील इटालियन मार्बल असलेली श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुवार दि. ७ ऑक्टोबर १९५४ रोजी करण्यात आली असून या घटनेला आजरोजी ७० वर्ष पूर्ण झाली आहे.साई मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीवर नित्यानेमाने होणाऱ्या पूजा अर्चा दुग्धभिषेक यामुळे भविष्यात मूर्तीची झिज होऊ शकते. मात्र अद्यापपर्यंत मूर्तिकार तालीम यांनी तयार केलेल्या श्री साईबाबांच्या मूर्तिमध्ये काहीच फरक पडलेला नाही.



तरीही कुठे इजा किंवा असा प्रसंग उद्भवल्यास या थ्रीडी स्कॅनवरून मूर्तिचे संवर्धन करू शकतो.म्हणून श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्री साईबाबांच्या संगमरवरी (इटालीयन मार्बल) मूर्तीची थ्रीडी स्‍कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करणेकामी (पुरातत्व विभाग) छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांनी सुचित केल्याप्रमाणे स्‍थापन करणेत आलेल्या विविध तज्ञ समिती मधील सदस्य दि.२० डिसेंबर रोजी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देवून पाहणी करणार आहेत. त्यामुळे दि.२० रोजी दुपारी १.४५ ते ४.३० या पाऊण तासाच्या दरम्यान साई समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.


याची सर्व भाविक भक्‍तांनी नोंद घ्यावी व त्यानुसार आपली यात्रा योजना आखावी असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले असून याकामी साईभक्तांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून