Maharashtra Winter Temprature : महाराष्ट्र गारठले! मुंबईत ९ वर्षातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

मुंबई : राज्यात पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबईत सोमवारी गेल्या ९ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तर जळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली जळगावमध्ये ८.९ डिग्री अंश सेल्सिअस एवढे कमी तापमान नोंदवले गेले. तर पुण्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे देखील कमी तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस राज्याच्या तापमानात आणखी ४ ते ५ अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.



राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबईकरांसाठी सोमवार गारेगार व थंडीचा ठरला. मुंबईकरांनी गुलाबी थंडीचा आनंद सोमवारी घेतला. सोमवारी मुंबईत पहाटे गेल्या ९ वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ केंद्रात सोमवारी १३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या ९ वर्षातील हे सर्वात कमी तापमान होते. यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये किमान तापमान ११.४ अंश सेल्सियस होते. मुंबईत किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या बाबत भारतीय हवामान विभागाचे पुण्याचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे येत्या २४ तासांत मुंबई, नाशिक, जळगाव व पुण्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.


पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज आग्नेय बंगालच्या उपसागर आणि लगतच्या पूर्व विषुववृत्तीय हिंद महासागरावरील कमी दाबाचे क्षेत्र स्थिर आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेला सुरू असून पुढील २४ तासात ते अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान पुढील चार ते पाच दिवस दहा ते आठ डिग्री राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

माजी खासदाराचे निधन, मुख्यमंत्र्यांनी पाठवला शोकसंदेश

लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे

कोकणच्या विकासाची नवी नांदी

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

BMC : मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुंबई : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना