S.M krishana Passed Away : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे निधन

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मल्लैय्या कृष्णा यांचे आज मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. कृष्णा यांनी बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मद्दूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

दिवंगत एस.एम. कृष्णा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, केंद्रीय परराष्ट्र मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल अशी विविध १० मानाची पदे भूषविली होती. एस.एम. कृष्णा यांनी १९६० च्या दशकात राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी १९६२ साली पहिल्यांदाच अपक्ष म्हणून मद्दूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर ते प्रजा सोशलिस्ट पार्टीत दाखल झाले. तसेच १९६८ मध्ये त्यांनी मंड्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकली.



कृष्णा १९७१ मध्ये काँग्रेसमध्ये परतले. पुन्हा त्यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. त्यानंतर १९८५ मध्ये ते राज्याच्या राजकारणात परतले. ते १९९९ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले आणि २००४ पर्यंत मुख्यमंत्री पदावर राहिले. कृष्णा यांनी जानेवारी २०२३ मध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस. एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोकसंदेशात पंतप्रधान म्हणाले की, एस.एम. कृष्णा हे एक असामान्य नेते होते. इतरांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी नेहमीच अथक परिश्रम घेतले. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी भर दिला. एस. एम. कृष्णाजी हे एक विपुल वाचक आणि विचारवंत असल्याचे मोदींनी नमूद केले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये एस. एम. कृष्णा यांच्याशी मला संवाद साधण्याची अनेकवेळा संधी मिळाली. त्यांची ही आठवण नेहमी स्मरणात राहील असे मोदी म्हणालेत.

Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या