Delhi School Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण


नवी दिल्ली : दिल्लीतील शाळा, हॉटेल, विमानतळासह अनेक ठिकाणे बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत होत्या. अजूनही हे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी पुन्हा दिल्लीतील शाळा (Delhi School) बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात (Delhi School Bomb Threat) आल्या आहेत. धमकीची माहिती मिळताच घटनेचा कसून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



आज सकाळी सात वाजेच्या सुमारास दिल्लीतील चाळीस शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. यामध्ये पश्चिम विहारच्या डीपीएस आणि जीडी गोयंका स्कूल व्यवस्थापनाला धमकी देण्यात आली. त्याचबरोबर आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल, पश्चिम विहारमधील जीडी गोएंका, मयूर विहारमधील मदर मेरी स्कूल, चाणक्यपुरीतील ब्रिटिश स्कूल, मयूर विहारमधील सलवान पब्लिक स्कूल, मंडी हाऊसमधील मॉडर्न स्कूल, केंब्रिज स्कूल, वसंत कुंजमधील दिल्ली पब्लिक स्कूल अशा अनेक शाळांचा समावेश आहे.


दरम्यान, धमकीनंतर शाळा प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक घरी पाठवले आहे. तसेच तात्काळ अग्नीशमन दल आणि पोलिस दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. सध्या शाळांमध्ये दिल्ली पोलिसांचे एक पथक आरके पुरमच्या दिल्ली पब्लिक स्कूल येथे पोहचले आहे. याबरोबरच बॉम्ब शोधक पथक देखील घटनास्थळी हजर झाले आहे. (Delhi School Bomb Threat)

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही