Delhi School Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण


नवी दिल्ली : दिल्लीतील शाळा, हॉटेल, विमानतळासह अनेक ठिकाणे बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत होत्या. अजूनही हे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी पुन्हा दिल्लीतील शाळा (Delhi School) बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात (Delhi School Bomb Threat) आल्या आहेत. धमकीची माहिती मिळताच घटनेचा कसून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



आज सकाळी सात वाजेच्या सुमारास दिल्लीतील चाळीस शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. यामध्ये पश्चिम विहारच्या डीपीएस आणि जीडी गोयंका स्कूल व्यवस्थापनाला धमकी देण्यात आली. त्याचबरोबर आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल, पश्चिम विहारमधील जीडी गोएंका, मयूर विहारमधील मदर मेरी स्कूल, चाणक्यपुरीतील ब्रिटिश स्कूल, मयूर विहारमधील सलवान पब्लिक स्कूल, मंडी हाऊसमधील मॉडर्न स्कूल, केंब्रिज स्कूल, वसंत कुंजमधील दिल्ली पब्लिक स्कूल अशा अनेक शाळांचा समावेश आहे.


दरम्यान, धमकीनंतर शाळा प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक घरी पाठवले आहे. तसेच तात्काळ अग्नीशमन दल आणि पोलिस दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. सध्या शाळांमध्ये दिल्ली पोलिसांचे एक पथक आरके पुरमच्या दिल्ली पब्लिक स्कूल येथे पोहचले आहे. याबरोबरच बॉम्ब शोधक पथक देखील घटनास्थळी हजर झाले आहे. (Delhi School Bomb Threat)

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या