Rohit Sharma : रोहित शर्माने सांगितले बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवाचे कारण

नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या डे-नाईटच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने रविवारी १० गडी राखून शानदार विजय नोंदवला. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १९ धावांचे माफक लक्ष्य दिवसाच्या पहिल्या सत्रातच ३.२ षटकांत कोणतेही नुकसान न करता पूर्ण केले. पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव अवघ्या १७५ धावांत आटोपला. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, हा आठवडा आमच्यासाठी निराशाजनक होता, पुरेसा खेळ केला नाही.



रोहित शर्मा म्हणाला की, 'आमच्यासाठी हा एक निराशाजनक आठवडा होता, आम्ही खेळ जिंकण्यासाठी पुरेसा चांगला खेळ केला नाही आणि ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. खेळात अशा अनेक संधी आल्या जेव्हा आम्हाला त्या संधींचा फायदा उठवता आला असता पण आम्ही ते करण्यात अपयशी ठरलो आणि त्यामुळे आम्हाला खेळ गमवावा लागला. आम्ही पर्थमध्ये जे केले ते खूप खास होते, आम्हाला येथे येऊन ते पुन्हा करायचे होते; पण प्रत्येक कसोटी सामन्याची स्वतःची आव्हाने असतात. गुलाबी चेंडूने खेळणे आव्हानात्मक असेल हे आम्हाला माहीत होते.असे त्याने म्हटले.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून