Rohit Sharma : रोहित शर्माने सांगितले बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवाचे कारण

नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या डे-नाईटच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने रविवारी १० गडी राखून शानदार विजय नोंदवला. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १९ धावांचे माफक लक्ष्य दिवसाच्या पहिल्या सत्रातच ३.२ षटकांत कोणतेही नुकसान न करता पूर्ण केले. पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव अवघ्या १७५ धावांत आटोपला. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, हा आठवडा आमच्यासाठी निराशाजनक होता, पुरेसा खेळ केला नाही.



रोहित शर्मा म्हणाला की, 'आमच्यासाठी हा एक निराशाजनक आठवडा होता, आम्ही खेळ जिंकण्यासाठी पुरेसा चांगला खेळ केला नाही आणि ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. खेळात अशा अनेक संधी आल्या जेव्हा आम्हाला त्या संधींचा फायदा उठवता आला असता पण आम्ही ते करण्यात अपयशी ठरलो आणि त्यामुळे आम्हाला खेळ गमवावा लागला. आम्ही पर्थमध्ये जे केले ते खूप खास होते, आम्हाला येथे येऊन ते पुन्हा करायचे होते; पण प्रत्येक कसोटी सामन्याची स्वतःची आव्हाने असतात. गुलाबी चेंडूने खेळणे आव्हानात्मक असेल हे आम्हाला माहीत होते.असे त्याने म्हटले.

Comments
Add Comment

टी-२०मधील सर्वात धक्कादायक निकाल, दुबळ्या नामिबियाने बलाढ्य द. आफ्रिकेला हरवले

विंडहोक : क्रिकेट जगतात नामिबियाने एक मोठा उलटफेर केला आहे. नामिबियाने त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळल्या

IND(W) vs AUS(W): आज भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कोणाचे पारडे आहे जड? घ्या जाणून

मुंबई: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आज १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाची लढत ऑस्ट्रेलियासोबत होत

शुभमन गिलने रचला इतिहास... WTC मध्ये तोडला रोहित शर्माचा विक्रम

मुंबई: भारतीय कर्णधार शुभमन गिल टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवत आहे. गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने