IND vs AUS: दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा लाजिरवाणा पराभव

  73

मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला १० विकेटनी पराभव सहन करावा लागला. पर्थमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचे शेर मात्र अॅडलेडमध्ये ढेर झाले. हा कसोटी सामना पिंक बॉलने(pink ball) खेळवण्यात आले. पिंक बॉलसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.


या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने २९५ धावांनी विजय मिळवला होता. पर्थमध्ये गोलंदाजांसह फलंदाजांनीही विजयात मोलाचे योगदान दिले होते. यशस्वी जायसवाल आणि विराट कोहलीने शतके ठोकली होती. तर जसप्रीत बुमराहने ८ विकेट मिळवल्या होत्या. अशातच पर्थमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे हिरो अॅडलेडच्या मैदानावर मात्र हतबल दिसले.


संपूर्ण सामन्यात टीम इंडियाला दोन्ही डावांत मिळून केवळ ८१ षटकांचा खेळ करता आला. टीम इंडियाने पहिल्या डावात १८० आणि दुसऱ्या डावात १७५ धावा केल्या. पहिल्या डावात ३०० धावा जरी बनल्या असत्या तरी टीम इंडियाला फायदा झाला असता. हा दुसरा कसोटी सामना डे-नाईट होता.


या गुलाबी बॉलच्या कसोटीत भारत पुन्हा एकदा अयशस्वी पाहायला मिळाला. याआधीच्या कसोटीतही भारताला पराभव सहन करावा लागला होता.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार