IND vs AUS: दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा लाजिरवाणा पराभव

मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला १० विकेटनी पराभव सहन करावा लागला. पर्थमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचे शेर मात्र अॅडलेडमध्ये ढेर झाले. हा कसोटी सामना पिंक बॉलने(pink ball) खेळवण्यात आले. पिंक बॉलसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.


या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने २९५ धावांनी विजय मिळवला होता. पर्थमध्ये गोलंदाजांसह फलंदाजांनीही विजयात मोलाचे योगदान दिले होते. यशस्वी जायसवाल आणि विराट कोहलीने शतके ठोकली होती. तर जसप्रीत बुमराहने ८ विकेट मिळवल्या होत्या. अशातच पर्थमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे हिरो अॅडलेडच्या मैदानावर मात्र हतबल दिसले.


संपूर्ण सामन्यात टीम इंडियाला दोन्ही डावांत मिळून केवळ ८१ षटकांचा खेळ करता आला. टीम इंडियाने पहिल्या डावात १८० आणि दुसऱ्या डावात १७५ धावा केल्या. पहिल्या डावात ३०० धावा जरी बनल्या असत्या तरी टीम इंडियाला फायदा झाला असता. हा दुसरा कसोटी सामना डे-नाईट होता.


या गुलाबी बॉलच्या कसोटीत भारत पुन्हा एकदा अयशस्वी पाहायला मिळाला. याआधीच्या कसोटीतही भारताला पराभव सहन करावा लागला होता.

Comments
Add Comment

भारत दौऱ्यातून मेस्सीला ८९ कोटींची कमाई, भारताला कररूपाने ११ कोटींचे उत्पन्न

मुंबई  : लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकताच भारताचा दौरा केला होता. कोलकाता येथे झालेल्या १३ डिसेंबर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाची सहाव्या स्थानावर घसरण

नवी दिल्ली  : माऊंट मांघनाई इथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा ३२३ धावांनी धुव्वा उडवत न्यूझीलंडने

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

जेमिमाच्या अर्धशतकाने श्रीलंकेची कोंडी; मालिकेत १-० ने आघाडी विशाखापट्टणम : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष