Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवण्याची मागणी

  119

सोलापूर : राज्य सरकारला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवणार्‍या ‘लाडकी बहीण’ योजनेचा(Ladki Bahin Yojana) अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती. आता ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करता येत नाही. या योजनेपासून अनेक महिला वंचित असून त्यांना अर्ज करण्यासाठी आणखी मुदत वाढवून देण्याची मागणी महिलावर्गातून होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ‘लाडकी बहीण’ योजना सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना आता अर्ज भरता येणार का याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे अनेक महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा अर्ज करण्यास सवलत देण्याची मागणी करण्यात येते आहे.


राज्यात साधारण सव्वादोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत १० लाख ५२ हजार ३९२ महिला आहेत. जिल्ह्यासाठी पुढील वाढीव हप्ता २१५ कोटी ३३ लाख २५ हजारांचा आहे. योजनेंतर्गत आता काही निकष असणार आहेत

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका