मोबाईलने घेतला दोघांचा बळी; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

गोंदिया : मोबाईलचा गैरवापर ,मोबाईल जास्त प्रमाणात वापरणे हि तक्रार वारंवार पालकांकडून येत असते. लहान मुले खेळाला कमी आणि मोबाईलला जास्त प्राधान्य देतात अशी तक्रार पालक शिक्षकांकडे करतात. मात्र गोंदिया जिल्ह्यात मोबाईलच्या स्फोटात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.



खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध इथं सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. सुरेश संग्रामे (वय ५५) असं मृतक शिक्षकाचं नाव आहे. तर नत्थु गायकवाड (५६) असं गंभीर जखमी असलेल्या इसमाचं नाव आहे.


मृतक सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी नत्थु गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. दोघेही नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं निघाले असताना ही घटना घडली. गंभीर जखमी नत्थु गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Comments
Add Comment

Navale Bridge traffic rule : पुण्यात नवले ब्रिज मार्गावर ४० किमी वेगमर्यादा लागू; पालखी सोहळ्यामुळे RTO चाचण्यांच्या वेळापत्रकातही बदल

पुणे : शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारती

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Police Suicide : मुंबईच्या लोकभवनात SRPF जवानाची आत्महत्या; गार्ड ड्युटीवर असताना सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

मुंबई : मलबार हिल (Malabar Hill) येथील लोकभवन (Lokbhavan) परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात