Maharashtra legislature : विधीमंडळाचे आजपासून विशेष अधिवेशन

मुंबई : नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी पार पडला. आता शनिवारपासून राज्याचे विशेष अधिवेशन सुरु होत आहे. नव्या विधानसभा अध्यक्षांची ९ डिसेंबरला निवड होणार असून त्यासाठी भाजपाकडून ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष भाजपाने त्यांच्याकडे घेतले होते. भाजपाने त्यावेळी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाऊ शकते.राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.


७, ८ आणि ९ डिसेंबरला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. ७ आणि ८ डिसेंबरला आमदारांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. दरम्यान विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड ९ नोव्हेंबरला केली जाणार आहे. पण त्याआधी ८ डिसेंबरला अर्ज दाखल केला जाणार आहे. दरम्यान विधानसभेच्या आमदारांच्या शपथविधीची विधानभवनात तयारी सुरू झाली आहे. निवडून आलेले प्रतिनिधी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आमदारकीची शपथ घेतील.

Comments
Add Comment

मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट! नेरूळ-उरण-बेलापूर पट्ट्यात अतिरिक्त लोकल सेवा लवकरच होणार सुरू

नवी मुंबई: नेरूळ उरण रेल्वेमार्गावर उपनगरीय रेल्वे सेवेत वाढ व्हावी म्हणून मागील अनेक दिवसांपासून मागणी

'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र' वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व