Maharashtra legislature : विधीमंडळाचे आजपासून विशेष अधिवेशन

मुंबई : नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी पार पडला. आता शनिवारपासून राज्याचे विशेष अधिवेशन सुरु होत आहे. नव्या विधानसभा अध्यक्षांची ९ डिसेंबरला निवड होणार असून त्यासाठी भाजपाकडून ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष भाजपाने त्यांच्याकडे घेतले होते. भाजपाने त्यावेळी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाऊ शकते.राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.


७, ८ आणि ९ डिसेंबरला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. ७ आणि ८ डिसेंबरला आमदारांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. दरम्यान विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड ९ नोव्हेंबरला केली जाणार आहे. पण त्याआधी ८ डिसेंबरला अर्ज दाखल केला जाणार आहे. दरम्यान विधानसभेच्या आमदारांच्या शपथविधीची विधानभवनात तयारी सुरू झाली आहे. निवडून आलेले प्रतिनिधी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आमदारकीची शपथ घेतील.

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची