Maharashtra legislature : विधीमंडळाचे आजपासून विशेष अधिवेशन

मुंबई : नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी पार पडला. आता शनिवारपासून राज्याचे विशेष अधिवेशन सुरु होत आहे. नव्या विधानसभा अध्यक्षांची ९ डिसेंबरला निवड होणार असून त्यासाठी भाजपाकडून ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष भाजपाने त्यांच्याकडे घेतले होते. भाजपाने त्यावेळी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाऊ शकते.राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.


७, ८ आणि ९ डिसेंबरला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. ७ आणि ८ डिसेंबरला आमदारांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. दरम्यान विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड ९ नोव्हेंबरला केली जाणार आहे. पण त्याआधी ८ डिसेंबरला अर्ज दाखल केला जाणार आहे. दरम्यान विधानसभेच्या आमदारांच्या शपथविधीची विधानभवनात तयारी सुरू झाली आहे. निवडून आलेले प्रतिनिधी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आमदारकीची शपथ घेतील.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.