Allu Arjun : अल्लू अर्जुनकडून मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई

  94

मुंबई : अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा २' या चित्रपटाचे हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये प्रीमियर शो चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन उपस्थित राहणार होता. ठरल्याप्रमाणे अल्लू अर्जुन त्याठिकाणी दाखल झाला. मात्र, यावेळी त्याला पाहण्यासाठी हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर प्रचंड गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेला मृत्यू झाला. तर, तिचा मुलगा या घटनेत गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेवर अल्लू अर्जुनने दुःख व्यक्त केले आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपले दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृत महिला आणि जखमींना मदत करणार असल्याचेही त्याने व्हिडीओत म्हटले आहे.





या कठीण प्रसंगी मी महिलेच्या कुटुंबियांसोबत असून मी स्वतः जावून त्यांची भेट घेईल. मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई देणार आहे. तसेच उपचार आणि औषधांचा सर्व खर्चही आम्ही करू. त्यांच्यासाठी मला जे काही करता येईल ते सर्वकाही मी करेल. हे नुकसान कधीच भरून काढता येणार नाही. आम्ही तुमच्या दुःखात सामिल आहोत, असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.


Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व