Allu Arjun : अल्लू अर्जुनकडून मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई

मुंबई : अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा २' या चित्रपटाचे हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये प्रीमियर शो चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन उपस्थित राहणार होता. ठरल्याप्रमाणे अल्लू अर्जुन त्याठिकाणी दाखल झाला. मात्र, यावेळी त्याला पाहण्यासाठी हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर प्रचंड गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेला मृत्यू झाला. तर, तिचा मुलगा या घटनेत गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेवर अल्लू अर्जुनने दुःख व्यक्त केले आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपले दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृत महिला आणि जखमींना मदत करणार असल्याचेही त्याने व्हिडीओत म्हटले आहे.





या कठीण प्रसंगी मी महिलेच्या कुटुंबियांसोबत असून मी स्वतः जावून त्यांची भेट घेईल. मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई देणार आहे. तसेच उपचार आणि औषधांचा सर्व खर्चही आम्ही करू. त्यांच्यासाठी मला जे काही करता येईल ते सर्वकाही मी करेल. हे नुकसान कधीच भरून काढता येणार नाही. आम्ही तुमच्या दुःखात सामिल आहोत, असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला