मराठमोळ्या लग्नांमध्ये आता परदेशी पदार्थांची रंगत

अमरावती : गोष्ट पदार्थाचे खास असतेच; पण आता भारतीय पदार्थ व चीनमधील खास पदार्थांना एकत्र करून फ्यूजन टेस्ट बनविली जात आहे. तसेच, मराठमोळी लग्नातील सुरुची भोजनात पिझ्झा व पास्ताचाही शिरकाव झाला आहे. हेच यंदाच्या लग्नसराईचे वैशिष्ट्य ठरत आहे. खवय्येही या नवीन चवीचा मनसोक्त आनंद घेत आहेत.


लग्न किती थाटामाटात करा, डोळे दिपविणारी भव्य-दिव्य सजावट, संगीत पार्टी, महागडे रिटर्न गिफ्ट सर्व काही करा त्याचे कौतुक होणारच; पण जेवणाची भट्टी जमली नाही, तर सर्वांचा हिरमोड होऊ शकतो. शेवटी लग्न सोहळ्याची संपूर्ण मदार 'जेवणा'वरच असते. जेवण फक्कड असेल, तर वधूपक्षाचे व केटरर्सचे पाहुण्यांकडून कौतुक होते. देशी-विदेशी व्यंजनांचा घेता येतो आस्वाद

शहरात शाही लग्न सोहळे पार पडत आहेत. यात देशी-विदेशी पदार्थांचे २७ पेक्षा अधिक प्रकार व ३९ पेक्षा अधिक काउंटर खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे. यात युरोपियन, मेक्सिकन, जपानी, चिनी देशातील प्रसिद्ध पदार्थांचे स्टॉल आहेत. थंडीचे दिवस लक्षात घेऊन स्ट्रीम फूड व लाइव्ह काउंटर फूड स्टॉलला मागणी वाढली आहे.


आता यात केटरर्सनी आणखी नावीन्य आणले आहे. दोन देशांतील प्रसिद्ध पदार्थ एकत्र करून नवीन डिश तयार केली जात आहे. दक्षिण भारतातील पदार्थ व त्यात चायनीज पदार्थ मिक्स करणे किंवा इटालियन व चायनीज पदार्थ मिक्स केल्याने फ्यूजन टेस्टचा आनंद पाहुण्यांना मिळत आहे.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि