PUBG : खेळण्यास सासूने मनाई केल्याने सून घर सोडून गेली

जिंद : हरियाणामधील जिंद जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या गावात PUBG गेम खेळण्यावरून कौटुंबिक वाद झाला. यानंतर २२ वर्षीय महिला बेपत्ता झाली. २६ नोव्हेंबर रोजी ही महिला घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली. महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे की, त्याची पत्नी मूळची बिहारची असून, त्यांचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.


तक्रारीनुसार, महिलेला PUBG गेम खेळण्याची आवड होती, मात्र तिच्या सासूने तिला हा गेम खेळण्यास मनाई केली होती. या किरकोळ वादानंतर ही महिला रागाच्या भरात घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही. पतीने पोलिसांना सांगितलं की, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास पत्नीने घराच्या भिंतीवरून उडी मारली आणि निघून गेली. तेव्हापासून तिचा शोध लागत नाही. या घटनेनंतर पतीने पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कुठेही सापडली नाही.


ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपास अधिकारी सुशीला यांनी सांगितलं की, पोलीस महिलेचा शोध घेत असून लवकरच तिचा शोध घेतला जाईल. याप्रकरणी स्थानिक लोकांकडेही चौकशी केली जात आहे. कौटुंबिक वादांमुळे वाढलेला तणाव आणि डिजिटल गेम्सच्या प्रभावावरही या प्रकरणामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.


PUBG गेमचं आजच्या तरुणाईला व्यसन लागलं आहे. यामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. परंतु आता घडलेली ही घटना काहीवेळा कौटुंबिक नातेसंबंध आणि छोटे-छोटे वाद किती गंभीर परिणामांना कारणीभूत ठरतात याचं एक उदाहरण आहे. पोलीस आता या महिलेच्या शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या