आसाम, मेघालय फिरण्याची संधी, कमी बजेटमध्ये IRCTCने आणलेय पॅकेज

  59

मुंबई: वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे. याच महिन्यात ख्रिसमसचा(christmas) सणही साजरा केला जातो. तर ख्रिसमस संपताच नवे वर्ष सेलिब्रेट करण्याची संधी येते. म्हणजेच संपूर्ण वर्षभरात जी काही धावपळ, मेहनत केली जाते त्याचा थकवा घालवण्यासाठी डिसेंबर चांगली संधी आहे.डिसेंबरच्या महिन्यात थंडीही असते. यादरम्यान अनेक जण बाहेर फिरायला जातात.


अनेकजण भारतातील विविध सुंदर ठिकाणी फिरायला जातात. यात नॉर्थ ईस्टच्या राज्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांबद्दल बोलायचे झाल्यास आसाम आणि मेघालय फिरण्यासाठी अनेक लोक जातात. आसामचे काझीरंगा पार्क आणि कामाख्या माता मंदिर येथे खूप गर्दी असते. जर तुम्हालाही येथे फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने शानदार पॅकेज आणले आहे.



IRCTC आसाम-मेघालय टूर पॅकेज


IRCTC अनेकदा प्रवाशांच्या सोयीसाठी देश-परदेशातील सुंदर शहरे फिरण्यासाठी शानदार टूर पॅकेज घेऊन येते. यावेळेस आयआरसीटीसीने Wonders of Assam & Meghalaya Ex Bengaluru हे पॅकेज आणले आहे. यात तुम्हाला आसाम आणि मेघालयची सुंदरता पाहायला मिळेल. IRCTCच्या टूरम्ये तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी, मावलिनोंग, काझीरंगा आणि गुवाहाटी ही शहरे फिरण्यासाठी मिळतील. हे पॅकेट फ्लाईट टूर पॅकेज असेल. हे ५ दिवस आणि ६ रात्रीचे पॅकेज असेल. यात तुम्हाला फिरण्यासाठी एसी बसची सुविधा मिळेल. सोबतच एक टूर गाईडही असेल.



द्यावे लागतील इतके पैसे


IRCTCच्या या आसाम आणि मेघालय टूरला १६ डिसेंबर २०२४ आणि २९ जानेवारी २०२५ या दोन तारखांना सुरूवात होईल. ज्या तारखेला तुम्हाला जायचे आहे तुम्ही बुकिंग करू शकता. एकट्याला या टूरवर जायचे असेल तर ४९५०० रूपये द्यावे लागतील. तर दोन लोक एकत्र या टूरवर जात असतील तर प्रति व्यक्ती ४२,५०० रूपये असतील. जर तीन लोक एकत्र जात असतील तर प्रती व्यक्ती ४०,७०० रूपये होतील. सोबतच ५ वर्षे ते ११ वर्षापर्यंतच्या मुलासाठी बेडसह ३५९९० रूपये तर बेडीशिवाय ३२९९० रूपये द्यावे लागतील.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या