आसाम, मेघालय फिरण्याची संधी, कमी बजेटमध्ये IRCTCने आणलेय पॅकेज

मुंबई: वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे. याच महिन्यात ख्रिसमसचा(christmas) सणही साजरा केला जातो. तर ख्रिसमस संपताच नवे वर्ष सेलिब्रेट करण्याची संधी येते. म्हणजेच संपूर्ण वर्षभरात जी काही धावपळ, मेहनत केली जाते त्याचा थकवा घालवण्यासाठी डिसेंबर चांगली संधी आहे.डिसेंबरच्या महिन्यात थंडीही असते. यादरम्यान अनेक जण बाहेर फिरायला जातात.


अनेकजण भारतातील विविध सुंदर ठिकाणी फिरायला जातात. यात नॉर्थ ईस्टच्या राज्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांबद्दल बोलायचे झाल्यास आसाम आणि मेघालय फिरण्यासाठी अनेक लोक जातात. आसामचे काझीरंगा पार्क आणि कामाख्या माता मंदिर येथे खूप गर्दी असते. जर तुम्हालाही येथे फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने शानदार पॅकेज आणले आहे.



IRCTC आसाम-मेघालय टूर पॅकेज


IRCTC अनेकदा प्रवाशांच्या सोयीसाठी देश-परदेशातील सुंदर शहरे फिरण्यासाठी शानदार टूर पॅकेज घेऊन येते. यावेळेस आयआरसीटीसीने Wonders of Assam & Meghalaya Ex Bengaluru हे पॅकेज आणले आहे. यात तुम्हाला आसाम आणि मेघालयची सुंदरता पाहायला मिळेल. IRCTCच्या टूरम्ये तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी, मावलिनोंग, काझीरंगा आणि गुवाहाटी ही शहरे फिरण्यासाठी मिळतील. हे पॅकेट फ्लाईट टूर पॅकेज असेल. हे ५ दिवस आणि ६ रात्रीचे पॅकेज असेल. यात तुम्हाला फिरण्यासाठी एसी बसची सुविधा मिळेल. सोबतच एक टूर गाईडही असेल.



द्यावे लागतील इतके पैसे


IRCTCच्या या आसाम आणि मेघालय टूरला १६ डिसेंबर २०२४ आणि २९ जानेवारी २०२५ या दोन तारखांना सुरूवात होईल. ज्या तारखेला तुम्हाला जायचे आहे तुम्ही बुकिंग करू शकता. एकट्याला या टूरवर जायचे असेल तर ४९५०० रूपये द्यावे लागतील. तर दोन लोक एकत्र या टूरवर जात असतील तर प्रति व्यक्ती ४२,५०० रूपये असतील. जर तीन लोक एकत्र जात असतील तर प्रती व्यक्ती ४०,७०० रूपये होतील. सोबतच ५ वर्षे ते ११ वर्षापर्यंतच्या मुलासाठी बेडसह ३५९९० रूपये तर बेडीशिवाय ३२९९० रूपये द्यावे लागतील.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर