Delhi Metro : प्रवाशांची गैरसोय! केबल चोरीमुळे दिल्ली मेट्रोसेवेत विलंब

नवी दिल्ली : प्रवासासाठी सर्वाधिक आरामदायक, ट्रॅफिकच्या समस्येवर मात करणारी तसेच सुपरफास्ट धावणारी दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सेवेचा वेग मंदावला असल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली मेट्रो लाईनवरील केबल चोरण्यात (Cable Theft) आल्या आहेत. त्यामुळे सध्या दिल्ली मेट्रो सेवा संथ गतीने धावत असून काही ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मोती नगर ते कीर्ती नगर दरम्यानच्या ब्लू लाईनवरील केबल चोरी झाली आहे. याचा फटका मेट्रोसेवेला बसल्यामुळे सर्व गाडवा धीम्या गतीने धावत आहेत. त्याचबरोबर दिल्ली-नोएडा दरम्यान कीर्ति नगर व मोती नगर मेट्रो स्टेशन दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (DMRC) करण्यात आले आहे.


त्याचबरोबर ब्लू लाईनवरील केबल चोरीचा प्रश्न रात्रीच्या कामकाजाचा कालावधी संपल्यानतरच सुटणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.




Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी