अभिवादन करण्यासाठी मुंबईला जाणा-या तरुणांवर चाकू हल्ला, नागरिकांनी केले रेलरोको

  69

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा येथील काही तरुण हे मुंबईला राज्यराणी एक्सप्रेसने अभिवादन करण्यासाठी जात असताना निफाड ते खेरवाडी दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेत त्यांच्यावर चाकू हल्ला केला व खेरवाडी रेल्वे स्थानकावर चैन पूलिंग करून पळ काढला. संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गाडी जाणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे राज्यराणी व सेवाग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या खेरवाडी स्थानकात खोळंबल्या आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, उद्या ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातील लाखो अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात पाच तारखेपासूनच हे सर्व जण यायला सुरुवात होते. मराठवाडा येथील काही तरुण आज राज्यराणी एक्सप्रेसने जात असतानाच निफाड ते खेरवाडी दरम्यान काही चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले त्यांना विरोध केला असता त्यांनी या तरुणांवर चाकूने हल्ला केला. यात तरुण जखमी झाले आहेत. मात्र, या सगळ्या गडबडीत या चोरट्यांनी खेरवाडी स्थानक येताच चैन पूलिंग केली व पळ काढला. मात्र, संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे या स्थानकात राज्यराणी सेवाग्राम या गाड्या खोळंबल्या. यामुळे रोज अप डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.



आरपीएफची प्रवाशांना विनंती...


या सगळ्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी माहिती घेतली व प्रवाशांना विनंती केली की सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. आपण फक्त रेल्वे जाऊ द्या. मात्र, प्रवाशांनी याला जोरदार विरोध केला. यामुळे मुंबईकडे जाणारी राज्यराणी व सेवाग्राम एक्सप्रेस या खोळंबल्या होत्या.

Comments
Add Comment

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,