Aryaman Birla: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर, ७० हजार कोटी नेटवर्थ

मुंबई: जर भारतातील अथवा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सबद्दल बोलायचे झाल्यास सगळ्यात पहिले नाव येते विराट कोहलीचे. मात्र तुम्हीही जाणून हैराण व्हाल की कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर नाही आहे. तर आणखी एक दुसरा भारतीय आहे जे नेटवर्थ आणि कमाईच्या बाबतीत टॉपवर आहे. आम्ही बोलत आहोत आर्यमन बिर्लाबद्दल(Aryaman Birla). मध्य प्रदेशसाठी डोमेस्टिकसाठी सामने खेळणाऱ्या आर्यमनने राजस्थान रॉयल्ससाठीही प्रतिनिधित्व केले आहे.


खरंतर, आर्यमान आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे. आर्यमानने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याने ९ फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. तर ४ लिस्ट ए सामने खेळले आहेत. आर्यमान आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचा भाग राहिला आहे. त्याने संघासाठी कधीही पदार्पणाची संधी मिळालेली नाही.



जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आर्यमान


आर्यमान टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. मात्र डोमेस्टिक स्तरावर मध्य प्रदेशसाठी सामना खेळला आहे. तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. मिडिया रिपोर्ट्नुसार आर्यमानची नेटवर्थ साधारण ७० हजार कोटी रूपये आहे. त्याची अधिकतर कमाई बिझनेसच्या माध्यमातून होते. आर्यमानला २०२३मध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँढ रिटेल लिमिटेडचे डायरेक्टर बनले होते.



वयाच्या २२व्या वर्षी घेतली निवृत्ती


आर्यमानने नोव्हेंबर २०१७ध्ये फर्स्ट क्लासमध्ये पदार्पण केले. त्याने मध्य प्रदेशसाठी खेळताना या फॉरमॅटमध्ये ४१४ धावा केल्या. त्याने करिअरमध्ये १ शतक आणि १ अर्धशतक ठोकले आहे. आर्यमानने शेवटचा फर्स्ट क्लास सामना जानेवारी २०१९मध्ये आंध्र प्रदेशसाठी खेळला. तर हैदराबादविरुद्ध २०१८मध्ये लिस्ट ए सामन्यात पदार्पण केले. आर्यमान लिस्ट एचे ४ सामने खेळला आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण