WTC Points Table: न्यूझीलंड- इंग्लंडला शिक्षा, भारताला कसोटी चॅम्पियनशिपमध्ये बंपर फायदा

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ यावेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारताने पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी हरवले होते. यासोबतच भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघादरम्यानचा दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरला अॅडलेडच्या ओव्हल मैदानात गुलाबी बॉलने खेळवला जाणार आहे. याआधी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपबाबत भारतीय संघासाठी चांगली बातमी समोर आली आहे.


इंग्लंडने मालिकेच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला ८ विकेटनी मात दिली. यामुळेच भारताचे WTC फायनलचे समीकरण थोडे सोपे झाले आहे.मात्र या दरम्यान आणखी एक बातमी आली आहे यामुळे भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.


ख्राईस्टचर्च कसोटीत स्लो ओव्हर रेटचे प्रकरण समोर आले आहे. या नियमाच्या उल्लंघनामुळे आयसीसीने न्यूझीलंड-इंग्लंडवर सामन्याच्या फीच्या १५ टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच डब्लूटीसी अंतर्गत दोन्ही संघांचे ३ गुणही कापण्यात आले आहेत. यामुळेच भारतीय संघाला बंपर फायदा झाला आहे.


पर्थ कसोटीच्या सुरूवातीला भारतीय डब्लूटीसी फायनलमध्ये सहज पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असा विजय हवा होता. मात्र आता ते मालिकेत ३-० अशा विजयानेही पोहोचू शकतील. म्हणजेच भारतीय संघाचे लक्ष्य आता ४ पैकी कमीत कमी २ सामन्यांत विजय मिळवणे आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण