WTC Points Table: न्यूझीलंड- इंग्लंडला शिक्षा, भारताला कसोटी चॅम्पियनशिपमध्ये बंपर फायदा

  89

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ यावेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारताने पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी हरवले होते. यासोबतच भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघादरम्यानचा दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरला अॅडलेडच्या ओव्हल मैदानात गुलाबी बॉलने खेळवला जाणार आहे. याआधी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपबाबत भारतीय संघासाठी चांगली बातमी समोर आली आहे.


इंग्लंडने मालिकेच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला ८ विकेटनी मात दिली. यामुळेच भारताचे WTC फायनलचे समीकरण थोडे सोपे झाले आहे.मात्र या दरम्यान आणखी एक बातमी आली आहे यामुळे भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.


ख्राईस्टचर्च कसोटीत स्लो ओव्हर रेटचे प्रकरण समोर आले आहे. या नियमाच्या उल्लंघनामुळे आयसीसीने न्यूझीलंड-इंग्लंडवर सामन्याच्या फीच्या १५ टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच डब्लूटीसी अंतर्गत दोन्ही संघांचे ३ गुणही कापण्यात आले आहेत. यामुळेच भारतीय संघाला बंपर फायदा झाला आहे.


पर्थ कसोटीच्या सुरूवातीला भारतीय डब्लूटीसी फायनलमध्ये सहज पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असा विजय हवा होता. मात्र आता ते मालिकेत ३-० अशा विजयानेही पोहोचू शकतील. म्हणजेच भारतीय संघाचे लक्ष्य आता ४ पैकी कमीत कमी २ सामन्यांत विजय मिळवणे आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार