नवी मुंबई : यंदा पाऊस थांबल्यानंतर पुन्हा भाज्यांच्या पिकाची लागवड करण्यात आली. परंतु सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण भाज्यांच्या वाढीस पूरक नसल्यामुळे भाजी काढणीसाठी तयार होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे बाजारात काही भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अशा विविध जिल्ह्यांतून भाज्या दाखल होतात. या बाजार समितीतून या भाज्या ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे ५५० ते ६०० भाज्यांच्या गाड्या दाखल होत असतात. गेले काही दिवसांपासून बाजार समितीत दुधी भोपळा, गवार, कोबी, दोडका, वांगी, शेवगा या भाज्यांची आवक घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण काही भाज्यांच्या वाढीसाठी पूरक नसल्यामुळे या भाज्यांची वाढ होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन घटल्याची माहिती नवी मुंबईचे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांनी दिली. तसेच सध्या मोठ्या प्रमाणात शेतमाल हा स्थानिक बाजारात विक्री केला जात आहे. त्यामुळे बाजार समितीत भाज्यांची आवक घटल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारचे उपसचिव मारुती पबितवार यांनी दिली. तसेच सध्या मोठ्या प्रमाणात शेतमाल हा स्थानिक बाजारात विक्री केला जात आहे. त्यामुळे बाजार समितीत भाज्यांची आवक घटल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारचे उपसचिव मारुती पबितवार यांनी दिली.
भारतात लसणाचे पीक झाले नसून इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशांतून लसणाची आयात केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लसणाची साठवण कमी आहे. मागील वर्षी १० ते २० प्रतिकिलो रुपयांनी बाजार भावाने लसूण विक्री केला जात होता. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी लसणाचे पीक घेतले नसल्याने भारतात लसणाची आवक घटली आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज अडीच ते तीन हजार नग लसूण येत आहे. घाऊकात २०० ते ३०० प्रति किलो रुपयांनी लसूण विकला जात आहे. १५ जानेवारीनंतर मध्य प्रदेश येथून लसूण आयात होईल. त्यानंतर लसणाचे दर कमी होतील, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा – बटाटा बाजार विभागातील साहाय्यक सचिव बाळासाहेब टावरे यांनी दिली.
मुंबई : संजू राठोडने (Sanju Rathod) गायलेले 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं प्रचंड लोकप्रिय…
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…