आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन


मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून तिसऱ्या क्रमांकावर येणार असून त्याची जबाबदारी येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच निर्भय असून त्यात भावी अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असेल. आपल्या अंगभूत गुणांनी तसेच अभ्यासपूर्ण कृतीतूनच हे ध्येय आपल्याला साध्य करता येईल, असा मूलमंत्र माजी मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिला.


युवा उत्थान फाऊंडेशनच्या वतीने सुशासनाचे प्रशासक या यूपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सर्वप्रथम नारायण राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर काही मोजक्या गुणवंतांनी आपल्या खडतर प्रवासाचे अनुभव सांगितले. युवा उत्थान फाऊंडेशन व नरेडकोचे पदाधिकारी अमोल गवळी, प्रशांत शर्मा, अनिता गवळी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम २०१६ पासून आयोजित केला जातो.


नारायण राणे पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात भारत हा अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर जाणार असून त्यासाठी आपल्या देशाचा जीडीपी कशाप्रकारे वाढवता येईल त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी संविधान, कायदे यांचा अभ्यास करून आपल्या देशाचे उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यामुळे जनतेलाही त्याचा फायदा पोहोचून आपल्या देशाचे नाव उंचावण्यास त्यामुळे मदत होईल व त्यासाठी सातत्यपूर्ण वाचन, चौफेर नजर आपण आत्मसात करावी. आपले व आपल्या देशाचे नाव मोठे करावे. एक अधिकारीपद म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी नको तर समाजासाठी काहीतरी ते करणारे असावे. तसेच कोणतेही काम भावनेच्या भरात करू नये तर संविधान व कायद्याच्या कसोटीत राहूनच सर्व करावे, असा सल्लाही नारायण राणे यांनी दिला.


आजच ठरवा की जे निर्णय घ्याल ते १४० कोटी जनतेच्या उत्कर्षासाठी असतील. अधिकारी बनला की चाल बदलते, ती बदलू नका. तुमच्यातली माणुसकी कायम ठेवा. पदाचा दुरुपयोग करू नका. पदाचा मान वाढवा, त्यामुळेच तुमचाही मान वाढेल असेही त्यांनी नमूद केले. नैतिकता स्वीकारावी. भविष्यात देश घडेल, त्यात तुमचे मोठे योगदान असेल असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी व्यासपीठावर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन सुरक्षा व नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र उपनवर, यू.पी.एस.सीचे माजी अध्यक्ष डॉ. डी. पी. अगरवाल, राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त रवींद्र शिसवे, सिप्झ विकासाचे सहआयुक्त मयूर मानकर, राजेश दोषी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग

NITESH RANE : अवैध मासेमारीविरोधातील कारवाई आणखी तीव्र करा मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

MUMBAI : "राज्यातील सागरी सीमांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ड्रोन आधारित देखरेख

MARINA PROJECT : मच्छीमारांना विश्वासात घेऊनच 'मरीना' प्रकल्प पूर्ण करणार- मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

MUMBAI : "मुंबईतील कफ परेड येथे साकारण्यात येणारा प्रस्तावित 'मरीना' प्रकल्प हा मुंबईच्या सागरी पर्यटन, जलवाहतूक आणि

Mumbai Airport Customs Seize 29 Exotic Animals : सुटकेस उघडली अन् आत होते अजगर, गिबन आणि...मुंबई विमानतळावर विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस

बँकॉकवरून आणलेल्या २९ दुर्मिळ वन्यजीवांची सुटका मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati

Dharavi Redevelopmen : सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास

मुंबई : सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा.