Narayan Rane : सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु करा!

खासदार नारायण राणे यांची वाहतूक मंत्र्यांकडे मागणी


मुंबई : मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा (Mumbai-Sindhudurga Airport) सुरू करण्यात आली होती. मात्र २६ ऑक्टोबर रोजी मुदत संपल्यानंतर चिपी-मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली. परंतु लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ही विमानसेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे केली आहे.



खा. नारायण राणे यांनी वाहतूक मंत्र्यांकडे विमानसेवेबाबत जारी केलेल्या निवेदनानुसार मुंबई – चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) अशी कार्यान्वित असलेली सेवा खूप चांगली होती. सणासुदीच्या काळात तसेच अन्य वेळीही मोठा फायदा प्रवाशांना आणि पर्यायाने कंपनीला होत असायचा. हंगामाच्या वेळी तर एका मार्गासाठी २५ हजारापर्यंत तिकीट देऊन प्रवाशांनी प्रवास केला आहे. या दरम्यान कधीकधी हवामान, तसेच अन्य तांत्रीक कारणामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका प्रवाशीसंख्येवरही झाला. परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या.


पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा त्वरीत कार्यरत व्हावी, अशी मागणीही खा. नारायण राणे (Narayan Rane) यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के.राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

Minister Pratap Sarnaik : एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना 'नो एन्ट्री'; मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

- अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'

Maharashtra Monsoon 2026 : मान्सून महाराष्ट्राच्या दारात! पुढील ४८ तास निर्णायक; अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

मुंबई : राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून नैऋत्य मान्सून

El Nino : एल निनोची धास्ती! दुष्काळाच्या भीतीने शेतकरी अस्वस्थ; मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल्समध्ये ६२% वाढ

मुंबई : राज्यात यंदा ‘एल निनो’च्या (El Nino) संभाव्य प्रभावामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून,

Toxic Liquor Case : विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; १.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त

फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरातील कथित मेथेनॉल मिश्रित गावठी दारू प्राशन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क

Beed Suicide : लग्नाचा १२ वा दिवस अन् नवरदेवाची आत्महत्या! बायकोच्या डायरीत दडलं होतं 'ते' भयानक सत्य

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका तलाठ्याने लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत आत्महत्या (Suicide) केल्याच्या

Jalgaon Road Accident : भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; जळगावात एका वर्षाच्या लेकरासह चौघांचा मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Road Accident) एका महिलेसह चार जणांचा दुर्दैवी