Narayan Rane : सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु करा!

खासदार नारायण राणे यांची वाहतूक मंत्र्यांकडे मागणी


मुंबई : मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा (Mumbai-Sindhudurga Airport) सुरू करण्यात आली होती. मात्र २६ ऑक्टोबर रोजी मुदत संपल्यानंतर चिपी-मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली. परंतु लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ही विमानसेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे केली आहे.



खा. नारायण राणे यांनी वाहतूक मंत्र्यांकडे विमानसेवेबाबत जारी केलेल्या निवेदनानुसार मुंबई – चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) अशी कार्यान्वित असलेली सेवा खूप चांगली होती. सणासुदीच्या काळात तसेच अन्य वेळीही मोठा फायदा प्रवाशांना आणि पर्यायाने कंपनीला होत असायचा. हंगामाच्या वेळी तर एका मार्गासाठी २५ हजारापर्यंत तिकीट देऊन प्रवाशांनी प्रवास केला आहे. या दरम्यान कधीकधी हवामान, तसेच अन्य तांत्रीक कारणामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका प्रवाशीसंख्येवरही झाला. परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या.


पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा त्वरीत कार्यरत व्हावी, अशी मागणीही खा. नारायण राणे (Narayan Rane) यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के.राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat : भोंदू खरातच्या कार्यालयात मिळाल्या महिलांच्या नावाने चेक आणि अंगठीच्या रिंगा

सिन्नर मध्ये रूपाली चाकणकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक नाशिक :  भोंदू बाबा अशोक खरात याच्या कार्यालयाची

Heatstroke : लातूर - उष्माघातामुळे बळींची संख्या ४ वर

लातूर :  निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतात काम करत असताना ७५

Nashik : महापौर-उपमहापौरांकडून रस्ते व विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ