Amravati Crime : खळबळजनक! अमरावतीतील अकोली परिसरात आढळला मुंडके छाटलेला मृतदेह 

  79

अमरावती : राज्यभरात खून, मर्डर, चोरी, अत्याचार, आत्महत्या असे गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालले असताना अमरावतीत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अमरावतीतील अकोली परिसरात स्थानिक खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या अंतर्गत स्मशानभूमीजवळ मुंडके छाटलेला मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. (Amravati Crime)



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी ही घटना उघडकीस आली. खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकोली स्मशान भूमिजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. धड आणि शिर वेगळं आढळलंय. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शालिकराम यादव यांच्या शेताजवळ हा मृतदेह आढळला.


दरम्यान, मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात पाठविला आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या निर्दयीपणे करण्यात आल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. तसेच मारेकऱ्यांनी खून करु मृताची ओळख पटू नये, यासाठी मुंडकं उडवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Amravati Crime)

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या