Millet Bread : दरवाढीचा दणका; चपाती पेक्षा बाजरीची भाकरी महाग!

वाडा : थंडी पडण्यास सुरुवात झाल्याने आता अनेकांनी आहारात बदल केला आहे. थंडीत अंगात उभ राहावी, यासाठी बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची भाकरी महाग (Millet Bread) झाली असून, दरही वाढले आहेत. थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली आहे. बाजरी गावरान क्विंटल दर हा कमाल २९०० किमान ३२०० एवढा आहे. संकरित बाजरी किमान ३००० ते ३२०० आहे. महिको किमान ३१०० कमाल ३५०० एवढा क्विंटल दर आहे. तालुक्यात बाजरीच्या भाकऱ्या कमी खातात. तरीसुद्धा थंडीत बाजरी भाकरी खाण्याचे प्रमाण अधिक असते. वाड्यात इतर जिल्ह्यातून बाजरी येते.



बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बाजरी मधुमेहाच्या रुग्णासाठी ही फायदेशीर ठरते. बाजरीतील पोषक तत्व डायबेटिसच्या रुग्णासाठी फायदेशीर ठरतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस बाजरीची भाकरी खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे तालुक्यात थंडी चांगलीच पडू लागली आहे. त्यामुळे थंडीत अंगात उब राहावी, यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते, थंडीमुळे बाजरीची मागणी बाजारात वाढली आहे.


गव्हाचे दर प्रति किलो ३५ ते ४० रुपये आहे. क्विंटल मागे २५००रुपये दर आहे. गव्हापासून पीठ तयार करून त्याची चपाती केली जाते. सध्या थंडी असल्याने गव्हा एवजी बाजरीचे पीठ घेण्याकडे कल वाढला आहे. झटपट तयार होणारी आणि आरोग्यास कोणताही अपाय न करणारी असल्याने बाजरीकडे कल असतो. बाजरी कमी साहित्यात आणि लवकर तयार होते. त्यामुळे बाजरीला मोठी मागणी आहे. २२०० ते २८०० पर्यंत दर बाजरीला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर

Devendra Fadnavis : हवामान विभागाचे अलर्ट पाहूनच घराबाहेर पडा!

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन; कनेक्टिंग लिंकवरील खड्ड्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर मुंबई : "राज्यात