Millet Bread : दरवाढीचा दणका; चपाती पेक्षा बाजरीची भाकरी महाग!

वाडा : थंडी पडण्यास सुरुवात झाल्याने आता अनेकांनी आहारात बदल केला आहे. थंडीत अंगात उभ राहावी, यासाठी बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची भाकरी महाग (Millet Bread) झाली असून, दरही वाढले आहेत. थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली आहे. बाजरी गावरान क्विंटल दर हा कमाल २९०० किमान ३२०० एवढा आहे. संकरित बाजरी किमान ३००० ते ३२०० आहे. महिको किमान ३१०० कमाल ३५०० एवढा क्विंटल दर आहे. तालुक्यात बाजरीच्या भाकऱ्या कमी खातात. तरीसुद्धा थंडीत बाजरी भाकरी खाण्याचे प्रमाण अधिक असते. वाड्यात इतर जिल्ह्यातून बाजरी येते.



बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बाजरी मधुमेहाच्या रुग्णासाठी ही फायदेशीर ठरते. बाजरीतील पोषक तत्व डायबेटिसच्या रुग्णासाठी फायदेशीर ठरतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस बाजरीची भाकरी खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे तालुक्यात थंडी चांगलीच पडू लागली आहे. त्यामुळे थंडीत अंगात उब राहावी, यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते, थंडीमुळे बाजरीची मागणी बाजारात वाढली आहे.


गव्हाचे दर प्रति किलो ३५ ते ४० रुपये आहे. क्विंटल मागे २५००रुपये दर आहे. गव्हापासून पीठ तयार करून त्याची चपाती केली जाते. सध्या थंडी असल्याने गव्हा एवजी बाजरीचे पीठ घेण्याकडे कल वाढला आहे. झटपट तयार होणारी आणि आरोग्यास कोणताही अपाय न करणारी असल्याने बाजरीकडे कल असतो. बाजरी कमी साहित्यात आणि लवकर तयार होते. त्यामुळे बाजरीला मोठी मागणी आहे. २२०० ते २८०० पर्यंत दर बाजरीला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी