मुंबई : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये परिवर्तन होते. ग्रहांच्या परिवर्तनामुळे अनेक राशींना याचा फायदा होतो तर काहींना तोटा. सध्या गुरू वृषभ राशीमध्ये तर बुध वृश्चिक राशीत परिवर्तन झाला आहे. यामुळे गुरू आणि बुध हे दोन्ही ग्रह समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग (Samsaptak Rajyog) तयार झाला आहे. या समसप्तक राजयोगाचा काही राशीतील लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या रास.
ढोल ताशांच्या गजरात साई बाबांच्या मिरवणुकीची पेण शहरात परिक्रमा
वृषभ रास
या राशीमध्ये गुरु मजबूत स्थितीत असून या राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. या राशीतील लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. इतर लोक तुमच्या कामाचे कौतुक करणार आहे. तुमच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी देखील संपणार आहेत.
सिंह रास
समसप्तक राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळून बढती मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळवू शकणार आहात. पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता आहे. नात्यात गोडवा येण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग देखील खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. करियरमध्ये तुम्हाला अनेक संधी मिळू शकणार आहेत. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार आहात ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात चांगला नफा मिळू शकतो.
(टीप – वरील माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित दिली आहे. ‘प्रहार’ अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)