Maharashtra CM: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम, शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मुंबईत परतले शिंदे, फडणवीस, पवार

मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांनाच पडलेला हा प्रश्न. विधानसभा निवडणुकीच्या निकालाल ६ दिवस उलटून गेले तरी अद्याप याचे उत्तर सापडलेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार यावरून दिल्लीमध्ये जोरदार बैठका सुरू आहेत. गुरूवारी रात्री दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची तीन तास बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे अध्यक्ष नड्डाही उपस्थित होते. सोबतच एनसीपी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते.


सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्र्यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी वेगवेगळी बातचीत केली. तिघांसोबत शाह यांनी कॅबिनेट विस्ताराबाबत चर्चा केली. खासदारांची संख्या पाहता भाजपला २० मंत्रालये आपल्याकडे हवी आहेत. तर एनसीपीपेक्षा शिवसेनेला अधिक मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.



बैठकीनंतर मुंबईत परतले तीनही नेते


दरम्यान, कोणते विभाग कोणाकडे असणार याबाबत चर्चा झालेली नाही. सगळ्यात विशेष म्हणजे मीटिंगनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत असलेला सस्पेन्स अद्याप कायम आहे. मीटिंग तीन तास सुरू होती. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तीनही नेते रात्री उशिरा मुंबईत परतले. आज फोनवर दुसऱ्या दौऱ्याची बातचीत होणा असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना