Maharashtra CM: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम, शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मुंबईत परतले शिंदे, फडणवीस, पवार

मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांनाच पडलेला हा प्रश्न. विधानसभा निवडणुकीच्या निकालाल ६ दिवस उलटून गेले तरी अद्याप याचे उत्तर सापडलेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार यावरून दिल्लीमध्ये जोरदार बैठका सुरू आहेत. गुरूवारी रात्री दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची तीन तास बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे अध्यक्ष नड्डाही उपस्थित होते. सोबतच एनसीपी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते.


सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्र्यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी वेगवेगळी बातचीत केली. तिघांसोबत शाह यांनी कॅबिनेट विस्ताराबाबत चर्चा केली. खासदारांची संख्या पाहता भाजपला २० मंत्रालये आपल्याकडे हवी आहेत. तर एनसीपीपेक्षा शिवसेनेला अधिक मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.



बैठकीनंतर मुंबईत परतले तीनही नेते


दरम्यान, कोणते विभाग कोणाकडे असणार याबाबत चर्चा झालेली नाही. सगळ्यात विशेष म्हणजे मीटिंगनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत असलेला सस्पेन्स अद्याप कायम आहे. मीटिंग तीन तास सुरू होती. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तीनही नेते रात्री उशिरा मुंबईत परतले. आज फोनवर दुसऱ्या दौऱ्याची बातचीत होणा असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी