Maharashtra CM: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम, शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मुंबईत परतले शिंदे, फडणवीस, पवार

मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांनाच पडलेला हा प्रश्न. विधानसभा निवडणुकीच्या निकालाल ६ दिवस उलटून गेले तरी अद्याप याचे उत्तर सापडलेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार यावरून दिल्लीमध्ये जोरदार बैठका सुरू आहेत. गुरूवारी रात्री दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची तीन तास बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे अध्यक्ष नड्डाही उपस्थित होते. सोबतच एनसीपी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते.


सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्र्यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी वेगवेगळी बातचीत केली. तिघांसोबत शाह यांनी कॅबिनेट विस्ताराबाबत चर्चा केली. खासदारांची संख्या पाहता भाजपला २० मंत्रालये आपल्याकडे हवी आहेत. तर एनसीपीपेक्षा शिवसेनेला अधिक मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.



बैठकीनंतर मुंबईत परतले तीनही नेते


दरम्यान, कोणते विभाग कोणाकडे असणार याबाबत चर्चा झालेली नाही. सगळ्यात विशेष म्हणजे मीटिंगनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत असलेला सस्पेन्स अद्याप कायम आहे. मीटिंग तीन तास सुरू होती. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तीनही नेते रात्री उशिरा मुंबईत परतले. आज फोनवर दुसऱ्या दौऱ्याची बातचीत होणा असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर