नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे काँग्रेसचा पराभव- खरगे

  61

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला नेत्यांची बेताल वक्तव्य आणि एकतेचा अभाव ही कारणीभूत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये खरगे यांच्या नेतृत्वात पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही उपस्थित होते.


खरगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये देखील एक वेगळा उत्साह होता. मात्र त्यानंतर तीन राज्यांत निवडणुका झाल्या तिथे आपल्याला जी अपेक्षा होती, त्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. इंडी आघाडीनं चार पैकी दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं, मात्र त्यामध्ये काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती.


मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो. आपल्या पराभवाची दोनच कारणं आहेत, त्यापैकी सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षात असलेला एकजुटीचा अभाव आणि दुसरं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद, एकमेकांविरोधात देण्यात येणारी स्टेटमेंट यांमुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे, जर हे वेळीच थांबवलं गेलं नाही, तर याचा मोठा फटका हा आपल्या पक्षाला बसू शकतो. ज्या राज्यात आपला पराभव झाला तिथे आपली संघटना म्हणावी तेवढी मजबूत नाही. आपल्याला त्या राज्यात आपलं संघटन मजबूत करण्याची गरज आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची एक मजबूत मोट आपल्याला बांधावी लागणार आहे. सोबतच त्या-त्या राज्यात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, तेथील स्थानिक मुद्दे आपल्या लक्षात घ्यावे लागतील, त्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रूपरेषा तयार करावी लागेल

Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या