Garlic Benefits: दररोज सकाळी खा कच्चा लसूण, होतील आश्चर्यकारक फायदे

मुंबई: लसणाचा(Garlic Benefits) वापर भारतीय पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. यासोबतच आरोग्यासाठीही लसूण खूप फायदेशीर आहे.


लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो जो अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी भरपूर असतो. सोबतच याच व्हिटामिन आणि पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटामिन बी१, बी६, सी सोबतच मँगनीज, कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम आणि अनेक खनिजे असतात.


दररोज लसणीचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार दूर राहण्यास मदत होते. लसूण खाण्याची योग्य पद्धती सकाळी रिकाम्या पोटी खाणे. तुम्ही एका दिवसांत ३ ते ५ पाकळ्या लसणीचे सेवन करू शकता. हे खाल्ल्याने जर शरीरातून दुर्गंधी येत असेल तर लसूण सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करून भिजवून सकाळी याचे सेवन करा.


जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल, कोलेस्ट्रॉल अथवा हृदयाशी संबंधित आजार असतील तर लसूण रात्री भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. सर्दी खोकल्यामध्येही लसूण अतिशय फायदेशीर आहे. श्वासासंबंधित आजारांमध्ये लसणाचा फायदा होतो.



लसणाच्या वापरामुळे पचनतंत्रही मजबूत होते. यातील अनेक पोषकतत्वे जेवण पचवण्यास मदत करतात. लसणाचे सेवन केल्याने स्किन हेल्दी आणि चमकदार बनते. सोबतच लसणाचा केसांसाठीही फायदा होतो.


टीप - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय अंमलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण