Garlic Benefits: दररोज सकाळी खा कच्चा लसूण, होतील आश्चर्यकारक फायदे

  91

मुंबई: लसणाचा(Garlic Benefits) वापर भारतीय पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. यासोबतच आरोग्यासाठीही लसूण खूप फायदेशीर आहे.


लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो जो अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी भरपूर असतो. सोबतच याच व्हिटामिन आणि पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटामिन बी१, बी६, सी सोबतच मँगनीज, कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम आणि अनेक खनिजे असतात.


दररोज लसणीचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार दूर राहण्यास मदत होते. लसूण खाण्याची योग्य पद्धती सकाळी रिकाम्या पोटी खाणे. तुम्ही एका दिवसांत ३ ते ५ पाकळ्या लसणीचे सेवन करू शकता. हे खाल्ल्याने जर शरीरातून दुर्गंधी येत असेल तर लसूण सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करून भिजवून सकाळी याचे सेवन करा.


जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल, कोलेस्ट्रॉल अथवा हृदयाशी संबंधित आजार असतील तर लसूण रात्री भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. सर्दी खोकल्यामध्येही लसूण अतिशय फायदेशीर आहे. श्वासासंबंधित आजारांमध्ये लसणाचा फायदा होतो.



लसणाच्या वापरामुळे पचनतंत्रही मजबूत होते. यातील अनेक पोषकतत्वे जेवण पचवण्यास मदत करतात. लसणाचे सेवन केल्याने स्किन हेल्दी आणि चमकदार बनते. सोबतच लसणाचा केसांसाठीही फायदा होतो.


टीप - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय अंमलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत