CM: कोण असणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले त्यानंतरही अद्याप महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्याच्या (Chief Minister) चेहऱ्याबाबत घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदेंनी या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर हे निश्चित आहे की मुख्यमंत्री भाजपा पक्षाचाच असणार आहे. या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत.


मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीस बसणार की आणखी कोण याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.



४० मिनिटे सुरू होती बैठक


सूत्रांच्या माहितीनुसार सरकार स्थापन होण्याआधी बुधवारी रात्री दिल्लीत अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक साधारण ४० मिनिटे सुरू होती.



एकनाथ शिंदे यांची माघार


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या चार दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.


Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने