CM: कोण असणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले त्यानंतरही अद्याप महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्याच्या (Chief Minister) चेहऱ्याबाबत घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदेंनी या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर हे निश्चित आहे की मुख्यमंत्री भाजपा पक्षाचाच असणार आहे. या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत.


मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीस बसणार की आणखी कोण याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.



४० मिनिटे सुरू होती बैठक


सूत्रांच्या माहितीनुसार सरकार स्थापन होण्याआधी बुधवारी रात्री दिल्लीत अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक साधारण ४० मिनिटे सुरू होती.



एकनाथ शिंदे यांची माघार


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या चार दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला